शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार

By श्रीकिशन काळे | Updated: October 13, 2024 17:55 IST

रसिकांना संमेलनात काही त्रास होणार नाही, याबाबत संयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार

पुणे : दिल्लीमध्ये आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी देशभरातून आणि महाराष्ट्रातून सुमारे पाच हजार रसिक येण्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. संमेलनासाठी तालकटोरा इनडोअर स्टेडिअम स्थळ निश्चित केले असून, दिल्लीमध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम असणार नाही, त्या दृष्टिकोनातून या संमेलनाचे नियोजन होणार आहे.

मराठी भाषिकांसाठी दिल्ली येथे होणारे संमेलन गौरवशाली असणार आहे. दरवर्षी संमेलनामध्ये विविध परिसंवाद होत असतात. एकावेळी तीन ते चार मंडपांमध्ये कार्यक्रम होत असतात. ग्रंथप्रदर्शनासाठी स्वतंत्र मांडव टाकलेला असतो. गेल्यावर्षी अमळनेरला संमेलन झाले. तेव्हा जवळपास सर्वच मांडवांमध्ये खूप अंतर होते. त्यामुळे रसिकांना एका मांडवातून दुसरीकडे जाण्यासाठी त्रास सहन करावा लागला. पण आता दिल्लीतील संमेलनात तसा त्रास होणार नाही. कारण दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअमच्या परिघातच संमेलनाचे सर्व मांडव उभे असणार आहेत.

दिल्लीमध्ये मराठी भाषिक लोक सुमारे पाच लाखांहून अधिक आहेत. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आहेत. या संमेलनाला येणाऱ्यांची निवास व्यवस्था महाराष्ट्र सदन, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, जैन भवन आदी ठिकाणे करण्याचे नियोजन होत आहे. त्यासाठी संयोजक सरहद संस्था प्रयत्न करत आहे. दिल्लीमध्ये अनेक मराठी सनदी अधिकारी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासह संमेलनाला एकूण पाच हजार रसिक येतील, अशी अपेक्षा आहे. नेहमीच्या संमेलनात रात्री उशिरापर्यंत रंगणारी कविसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमही दिल्लीत होणार नाहीत. ते सायंकाळी संपविण्याचा प्रयत्न असणार आहे. संमेलनामध्ये बहुभाषिक आणि निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.

परिसंवादाचे विषय !

देशाचे राजकारण आणि मराठी साहित्य, मराठी आणि महाराष्ट्र धर्म, लेखक राजकारण्यांशी मनमोकळा संवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता, बृहन्महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती आणि जीवन, मराठीचा अमराठी संसार, परिचर्चा-आनंदी गोपाळ या पुस्तकावर, अनुवादावर परिसंवाद, मधुरव हा विशेष कार्यक्रम असणार आहे.

टॅग्स :Puneपुणेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळcultureसांस्कृतिकSocialसामाजिकartकलाEducationशिक्षणdelhiदिल्ली