शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Panshet Flood 1961: पळा.., पळा.., पाणी आले.. पाणी वाढले; आरोळ्या अन् एकच हाहाकार, पानशेत धरणफुटीला ६३ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 1:04 PM

६३ वर्षांपूर्वी अर्थात १२ जुलै १९६१ राेजी पुणे पूर्ण पाण्यात गेले, ताे दिवस आजही आठवला की अंगावर काटा येताे

सुदाम विश्वे, निवृत्त कलाशिक्षक

पुणे : उष:काळ हाेता हाेता काळरात्र हाेणे म्हणजे काय? हे ज्यांनी याचि देही याचि डाेळा अनुभवला ताे म्हणजे प्रसंग म्हणजे पानशेत धरणफुटीने पुण्यात घातलेला हाहाकार. या घटनेला शुक्रवारी (दि. १२) ६३ वर्षे पूर्ण हाेत आहेत. याबाबत माझ्या वडिलांनी सांगितलेले कटू अनुभव आजही डाेळ्यासमाेर उभे राहतात. त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अक्षरश: पुणेकर पुरते लुटले गेले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बराेबरच ६३ वर्षांपूर्वी अर्थात १२ जुलै १९६१ राेजी पुणे पूर्ण पाण्यात गेले हाेते. तो दिवस आठवण्याइतका मी मोठा नव्हतो; पण वडीलधाऱ्या मंडळींच्या ताेंडून अनेक वर्षे त्या कटू आठवणी ऐकत ऐकत लहानाचा माेठा झालाे, त्यामुळे ताे दिवस आजही आठवला की अंगावर काटा येताे.

वडील सांगत हाेते की, पळा... पळा... पाणी आले... पाणी वाढले... अशा आरोळ्या झाल्या आणि एकच हाहाकार उडाला. आम्ही त्यावेळी गणेशपेठ येथे राहत होतो. दगडी नागोबा येथे आमचे घर होते. नागझरी नाल्यातून पाणी थेट तेथील अनेक घरांमध्ये घुसले. आईने धैर्याने आम्हा लहानांना बाहेर काढत मनपाच्या शाळेत आश्रय घेतला. घरातील भांडी, इतर सर्व सामान पुरात वाहून गेले आणि क्षणात हाेत्याचे नव्हते झाले. फक्त घरातील मधला खांब होता त्याला एक कंदील व वडिलांचा फोटो होता तो वाचला होता.

आणखी एक आठवण वडीलधारी मंडळी सांगत असे. ती म्हणजे पुराचे पाणी ओसरल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी आले... पाणी आले... अशी आराेळी दिली गेली. लोक सर्व साेडून सैरावैरा पळू लागले. अशा प्रकारे नागरिकांना घाबरून भुरट्या चोरांनी घरातील सामान घेऊन पोबारा केला.

शासनाने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. पूरग्रस्तांसाठी बांधलेल्या गोखलेनगर येथे आम्हाला घर दिले. वडिलांनी जिद्दीने पुन्हा संसार उभा केला. आम्हाला शिक्षण दिले. स्वतःच्या पायावर उभे केले. पुरामुळे पुण्याचा विस्तार झाला. याच पानशेत पुरामुळे विस्थापित झालेल्यांसाठी गोखलेनगर येथे तीन टेकड्यांच्या मध्ये वसाहत वसवली गेली. हा भाग तसा संपूर्ण जंगलाचा, त्यामुळे सुरुवातीला घराबाहेर पडायलाही भीती वाटायची; पण आज तेच गोखलेनगर पुण्याच्या मध्यवस्तीत मोडते. पुरामुळे आम्ही गोखलेनगर येथे आलो आणि आमचे जीवन समृद्ध झाले, असे असले तरी ताे दिवस आठवला की आजही अंगावर काटा येताे.

टॅग्स :PuneपुणेfloodपूरWaterपाणीDamधरणRainपाऊसSenior Citizenज्येष्ठ नागरिक