शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

खडकवासला प्रणालीत ९.६२ टक्के पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2016 2:11 AM

खडकवासला धरण साखळीत अवघा ९.६२ टक्के (२.८0 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच कालावधील तब्बल १५.३८ टक्के (४.४८ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता

पुणे : खडकवासला धरण साखळीत अवघा ९.६२ टक्के (२.८0 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच कालावधील तब्बल १५.३८ टक्के (४.४८ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असल्याने तसेच जून अखेरीस पालखी सोहळ्यासाठी पाणी सोडावे लागणार. जून महिन्यात पावसाला सुरूवात न झाल्यास पुणे शहरातील पाणीकपात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेकडूनही कपातीबाबत विचार सुरू करण्यात आला असून, जून महिन्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण़्यात आले.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणी पातळी मे अखेर अवघ्या ९.६२ टक्क्यांवर आली आहे. या प्रकल्पात चार पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणे असून, या धरणांची एकूण क्षमता २९ टीएमसी आहे. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने आॅक्टोबर २0१५ अखेर या धरणांमध्ये केवळ ५0 टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यातील गावांसाठी पाण्याचे नियोजन केल्यानंतर ३0 मे अखेर या पाणीसाठा २.८0 टीएमसीवर पोहोचलेला आहे. केवळ शहरासाठी पाणी राखीव ठेवल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या पूर्वीच जाहीर केले आहे. दरम्यान, पुणे शहरासाठी दरमहा १ टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, हे पाणी राखीव ठेवल्यास जुलै अखेरपर्यंत हे पाणी शहरास पुरेल एवढे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)