शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उजनी धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात घट; वीज पुरवठ्यात २ तास कपात, पाणी उपशावर बंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 15:23 IST

महावितरण कंपनीने शेती सिंचनाच्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात केल्याने ८ तास दिली जाणारी वीज आता ६ तासच मिळणार

कळस : जायकवाडी नंतर राज्यातील दोन नंबरचे ११७ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणातील पाणी ३८ टक्के उणे पातळीत गेल्याने  जलाशयावरील पाणी उपशावर बंधन घालण्यात आले आहे. महावितरण कंपनीने शेती सिंचनाच्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात केली आहे. आठ तास दिली जाणारी वीज आता सहा तासच मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली दरवर्षी वीस टीएमसी नदीपात्रात वाया जाते. मात्र प्रशासनाकडून धरणग्रस्तांच्या पाणी उपशावर बंधन आणण्यासाठी दोन तास वीज कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील २८ गावे उजनी धरणात बुडीत तर ५ गावे बाधित झाली. या गावांतील शेतकऱ्यांना धरणाच्या निर्मितीनंतर सुरवातीला बारमाही पाणी उपशाचे परवाने देण्यात आले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून आता आठमाही पाणी परवाने दिले जात आहेत. यंदा धरण ६० टक्के भरल्याने पाण्याचे वेळीच योग्य नियोजन झाले नाही. पाणीसाठा आज उणे ३७.४७ टक्क्यांवर पोचला आहे धरण यावर्षी प्रथमच उजनीच्या इतिहासात उणे ७० टक्के होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जिल्हाधिकाऱ्यांना उजनीच्या उपसा सिंचन धारकांच्या पाणी वापरावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे नमूद करत, जिल्ह्यातील दौंड व इंदापूर तालुक्यातील सिंचनाच्या पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी वीज कपातीची मागणी पत्रव्यवहाव्दारे केली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बारामतीच्या विद्युत कंपनीचे अधीक्षक अभियंत्यांना वीज पुरवठ्यात दोन तास कपात करण्याची सूचना केली आहे. यानुसार तालुक्यातील वीज पुरवठ्यात दोन तासांची कपात करुन वीज पुरवठ्याचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. उजनीलगतच्या कांदलगाव, शहा, शिरसोडी, पडस्थळ, अजोती, कालठण, गंगावळण, कळाशी, चांडगाव, पळसदेव, डाळज, कुंभारगाव, भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, भावडी, अगोती यांसारख्या निव्वळ उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या हजारो ट्रान्सफार्मचा वीज पुरवठा कपात करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरीmahavitaranमहावितरणelectricityवीज