शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये; सदाभाऊ खोत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 14:46 IST

सरकारने कष्टाळू,दयाळू व मायाळू शेतकऱ्याला झिटकारु नये, शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल

इंदापूर : शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे. कष्टाळू,दयाळू व मायाळू असणा-या शेतकऱ्याला जर झिटकारले तर शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर आहे. हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये, असा सज्जड इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी (दि.१८) वरकुटे बुद्रुक येथे बोलताना दिला.

शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने ते तेथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गाईच्या दुधाला ७५ रुपये तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ती मान्य झाल्यास महागाई निश्चितपणे कमी होईल. रयत क्रांती संघटनेने दि. २२ मे रोजी काढलेल्या यात्रेमध्ये दूध दरवाढीचा विषय आम्ही लावून धरला होता. त्याच्या अनुषंगाने दुधाच्या प्रश्नावर २२ जून रोजी पुण्यात दुग्धविकास मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत १ हजार मिली दुधाला एका दारुच्या बाटलीचा भाव द्या, एवढीच साधी मागणी आपण करणार आहोत,असे ते म्हणाले.    यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात सन २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाची बिले तात्काळ द्यावीत. शेती तुकडेबंदी कायदा रद्द करावी. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करावे. दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांच्या पशुधनास १ रुपयात विमा लागू करावा या व इतर मागण्यांसदर्भात सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले.   भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर आंदोलनाचा इशारा

इंदापूरमधील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे देणे गरजेचे असताना ते दिले नाहीत. त्यामुळे गावगाड्यातील शेतकऱ्याला व त्याच्या पोरांना जागे करून दि.३० जून पर्यंत पैसे न दिल्यास दि. १ जुलै रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्यासमोर आंदोलन करणार आहोत असा इशारा खोत यांनी दिला आहे.

'विच्छा माझी पूर्ण करा' चा पार्ट टू म्हणजे संजय राऊत 

जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहू, त्यानंतर स्वतःच भगवा फडकवू, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, दादा कोंडकेंचे वगनाट्य होते ' विच्छा माझी पुरी करा' त्या वगनाट्याचा पार्ट टू म्हणजे  संजय राऊत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSadabhau Khotसदाभाउ खोत FarmerशेतकरीGovernmentसरकार