शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्याचा काहीच फरक पडला नाही; पंडितांची तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 14:54 IST

राजकीय पदाधिकाऱ्यांकडून काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याबाबत खोटी माहिती दिली जात असल्याची टीका संघटनेच्या सदस्यांनी केली

पुणे: काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या सामाजिक किंवा राजकीय स्थितीत आजही कोणताही फरक पडलेला नाही, असा दावा यूथ फॉर पनून काश्मीर या संघटनेच्या वतीने करण्यात आला. सरकारजवळ या पीडित पंडितांच्या पुनर्वसनासाठी कसलीही ठोस योजना नसल्याची टीका त्यांनी केली.

संघटनेच्या काही सदस्यांनी काश्मीरचा दौरा केला. त्याविषयी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सरकार चुकीचे सांगत असल्याचे आम्हाला आढळले असे राहुल कौल याने सांगितले. त्याच्यासमवेत संघटनेचे राहुल भट, सुनील रैना अन्य सदस्य होते. कौल यांनी सांगितले की, या दौऱ्यात अनेक काश्मिरी पंडितांबरोबर संवाद साधण्यात आला. त्यांच्याकडून सरकारविषयी तीव्र नाराजीच आढळली. ३७० कलम रद्द केले असले तरी परिस्थिती मात्र पूर्वी होती तशीच आहे, असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती संघटनेने पत्रकार परिषदेत दिली.

कौल म्हणाले की, पंतप्रधान पॅकेज योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच वेतन मागील ५ महिन्यांपासून झालेले नाही. पीडित कुटुंबांच्या तेथील परंपरागत जमिनींच्या नोंदी दिल्या जात नाहीत. सरकारी अधिकारी, तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याबाबत खोटी माहिती दिली जात असल्याची टीका संघटनेच्या सदस्यांनी केली. संघटनेच्या या दाव्याला काही हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शाहCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार