शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

मुंबई-पुणे महामार्गावर चालकांच्या निष्काळजीपणामुळे होतायेत अपघात; आता चाेवीस तास गस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 11:24 AM

मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांमधून १२ पथकांची निर्मिती

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावरीलअपघात रोखण्यासाठी बारा पथकांमार्फत पुढील सहा महिने २४ तास गस्त घालण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दाेन्ही महामार्गांवर अपघात कमी हाेण्यासाठी मदत हाेईल.

मुंबई- पुणे नवीन द्रुतगती महामार्गावर आणि जुना महामार्गावर पुढील सहा महिन्यांसाठी ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. याची सुरुवात गुरुवारी (दि. १ डिसेंबर) हाेणार आहे.

माेटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांमधून १२ पथकांची निर्मिती केली असून त्यात तीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. त्यातील दाेन्ही महामार्गांवर प्रत्येकी ६ पथके आणि १५ अधिकारी कार्यरत राहतील. या उपक्रमावर देखरेखीसाठी राज्य परिवहन उपायुक्त रस्ता सुरक्षा कक्ष भरत कळसकर यांची नियुक्ती केली आहे.

रस्त्यावरील अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता त्यामध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणामुळे तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे हाेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.

दाेन्ही महामार्गांवर राबविण्यात येणाऱ्या उपाययाेजना

- अपघातग्रस्त ठिकाणांचे (Black Spot) सर्वेक्षण तसेच उपाययोजना करणे आणि तेथे घडलेल्या अपघातांची माहिती देणारे फलक प्रदर्शित करणे.- महामार्गावर अवैधरीत्या पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई तसेच वाहतुकीत निर्माण झालेले अडथळे दूर करणे.- महामार्गावरील टोलनाक्यावर उद्घोषणा करून जनजागृती निर्माण करणे.- अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर इंटरसेप्टर वाहनांद्वारे कारवाई करणे.- उजव्या मार्गिकेतील ट्रक, बस, कंटेनर आदी कमी वेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.- चुकीच्या पद्धतीने मार्गिका लेन बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.- विना हेल्मेट, विना सीटबेल्ट प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि चालक, प्रवाशांवर कारवाई करणे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात जास्त 

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर या वर्षी ऑक्टाेबरअखेर १६८ अपघात झाले असून ६८ नागरिक मृत्युमुखी, तर ९२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुन्या महामार्गावर २३१ अपघात झाले असून, १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १६० लाेक जखमी झाले आहेत.

अपघात कमी करण्याच्या दृष्टीने ‘सुरक्षा’ या उपक्रमाची आखणी

महामार्गावर भरधाव वाहने चालविणे, सीटबेल्टचा वापर न करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी नियमभंग वाहनचालक करतात. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ हाेत आहे. वाहनचालकांना शिस्त लावणे, तसेच वाढते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने ‘सुरक्षा’ या उपक्रमाची आखणी केली आहे. - डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू