शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

हॉलतिकीटसाठी अडवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार; मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावींचा इशारा

By प्रशांत बिडवे | Updated: February 20, 2024 17:07 IST

गाेसावी म्हणाले, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांवर आपण कारवाई करीत असताे...

पुणे : शैक्षणिक शुल्क अथवा इतर काेणत्याही कारणामुळे दहावी तसेच बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे हाॅलतिकीट न देणे गंभीर बाब आहे. याप्रकारे शाळांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. विद्यार्थी, पालकांची तक्रार आल्यास संबंधित शाळांवर परीक्षा झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिला. तसेच आतापर्यंत आशा स्वरूपाच्या दाेन तक्रारी प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

गाेसावी म्हणाले, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांवर आपण कारवाई करीत असताे. संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि संचालक यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना हाॅलतिकीट न देणे अत्यंत गंभीर आहे. राज्य मंडळ काेणत्याही कारणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता गांभीर्याने घेत असते. आतापर्यंत आमच्याकडे दाेन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरवर्षी सरासरी दाेन ते तीन तक्रारी येत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून हे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.

गतवर्षी ११ गुन्ह्यांची नाेंद

परीक्षेदरम्यान गतवर्षी जे गैरप्रकार झाले, त्याबाबत ११ गुन्हे दाखल झाले असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिघात १४४ कलम लागू असते. केंद्राजवळ झेराॅक्स सेंटरही बंद केली जातात. परीक्षेदरम्यान मूळ विद्यार्थी तसेच डमी बसलेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला जातो तसेच मूळ विद्यार्थ्यांस पुढील पाच परीक्षेला बसू दिले जात नाही.

परीक्षेचा निकाल लवकर लावणार

गतवर्षी सुरुवातीचे काही दिवस शिक्षकांचा संप सुरू हाेता, तरीही आम्ही बारावीचा निकाल वेळेवर जाहीर केला हाेता. यंदाही मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बारावीचा निकाल लावण्यावर आमचा भर आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा