शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे आदित्य ठाकरेंनी केले सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 19:16 IST

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती.

आळेफाटा - वडगाव आनंद ता जुन्नर येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दशरथ केदारी यांचे कुटुंबीयांची गुरूवार (दि 27) रोजी शिवसेना युवा सेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आपल्या व्यथा मांडताना कुटुंबीयांचे अश्रू आनावर झाले होते. तर शिवसेना या कुटुंबीयांचे पाठिशी उभी राहणार असून त्यांचे मुलांचे शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती. आज गुरूवारी नाशिक येथील दौ-यानंतर दुपारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जुन्नर तालुक्यात येत वडगाव आनंद रेथील आत्महत्या केलेल्या या शेतक-याच्यी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी यावेळेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर 

माजी आमदार बाळासाहेब दांगट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी संपर्कप्रमुख संभाजी तांबे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे उपसभापती दिलीप डुंबरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके नारायणगाव सरपंच बाबु पाटे पंचायत समितीचे सदस्य जीवन शिंदे, गणेश कवडे, गणेश वाघमारे, कैलास वाळुंज, सचिन वाळुंज उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. तसेच त्यांच्या पत्नी शांता यांनी यावेळी भाऊबीज ओवाळणी केली तर आदित्य ठाकरे यांनीही साडी देत आर्थिक मदत केली.

यावेळेस पत्रकारांनी संवाद साधताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की वडगाव आनंद येथील घटना ही दुर्दैवी असून एक भाऊ म्हणून मी या कुटुंबीयांचे पाठिशी उभा राहणार आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून  अशा घटना घडत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांशी परिस्थिती अतिशय बिकट असून आतापर्यंत बांधावर कोणीही गेलेले नाही. कृषी मंत्री कोण व कुठे आहेत ते दिसणे गरजचे असल्याची टिका केली. नुकसानीचे संपुर्ण पंचनामे करून कोणतेही राजकारण न करता शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची व महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.  उपसभापती गो-हे म्हणाले की कांद्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांना भेडसावत आहे. अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असुन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी यापुढेही राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दौरा करणार आहे. तसेच केदारी कुटुंबीला घरकुल तसेचवअधिकची आर्थिक मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनीत्यांनी यावेळेस दिले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेFarmerशेतकरी