शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 18:28 IST

राज्यातील सध्याचे सरकार नसून ती एक सर्कस आहे...

पुणे : रोजगारासाठी तरुणांना लाठी खावी लागते हे दुर्दैव आहे. राज्यातील सध्याचे सरकार नसून ती एक सर्कस आहे. सध्या राज्यातील तरुणांचा रोजगार जातोय. मविआ सरकार असते तर वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta-Foxconn project) महाराष्ट्रात आणलाच असता, असं वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तळेगावात केलं. चाळीस आमदारांसोबत मीही राजीनामा देतो, सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाऊ, असं आव्हानही शिंदे गटातील आमदरांना आदित्य ठाकरेंनी दिले.

आज पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे शिवसेनेने आंदोलन केले. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. यावेळी हजारो शिवसैनिक एकत्र येत त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. 

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही, केंद्राला किंवा गुजरातला दोष देत नाही, हा दोष खोके सरकारचा आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेतला. सध्या राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत ऩाही. 

माझ्या गटात कोण येतंय त्यापेक्षा महाराष्ट्रात रोजगार कोण आणतंय ते पाहा. आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका. शिंदे सरकार हे सरकार नसून ती एक सर्कस आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी बोलताना लगावला.

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीस