शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

आश्वासनानंतर कानगाव ग्रामस्थांचे उपोषण मागे

By admin | Published: May 11, 2017 4:12 AM

कानगाव (ता. दौंड) येथील वीजपुरवठा १५ दिवसांपासून सुरळीत नाही; त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटस : कानगाव (ता. दौंड) येथील वीजपुरवठा १५ दिवसांपासून सुरळीत नाही; त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत. याबाबत सरपंच संपत फडके, दौंड तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष माऊली शेळके आणि ग्रामस्थांनी महावितरणविरोधात कानगाव येथील विठ्ठल मंदिरात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. या आंदोलनाला केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप भोळे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी उपोषणकर्त्याच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी ग्रामस्थांनी विद्युत उपकेंद्र मंजुरीबाबतची सध्याची परिस्थिती, शेतीपंपाला ८ तास सलग वीजपुरवठा मिळावा, गावठाण हद्दीतील जुन्या पथदिव्यांची दुरुस्ती करावी, सिंगल फेजिंगची कामे करावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या. या वेळी कार्यकारी अभियंता दिलीप भोळे यांनी उपोषणकर्त्यांना आपल्या मागण्या वरिष्ठांपर्यंत कळवतो आणि तुमच्या समस्या कमी करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करतो, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.या वेळी झालेल्या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा प्रवक्ते भानुदास शिंदे, दौंड तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विकास खळदकर, राहुल चाबुकस्वार यांनी भाग घेतला. या वेळी उपसरपंच बापूराव कोऱ्हाळे, भीमा-पाटसचे संचालक राजेंद्र गवळी, भास्कर फडके, दत्तात्रय मळेकर, अंकुश गवळी, विद्युत वितरणचे स्वप्निल साळुंके, लाईनमन भुजबळ यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. केवळ खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. परिणामी, शेतातील हातातोंडाशी आलेले उभी पिके जळून चालली आहेत.