शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

'कर्मयोगी' समोर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; थकीत रक्कम न दिल्याने आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 7:34 PM

कारखाना प्रशासन व आंदोलक शेतकरी यांची पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन कारखान्यांनी थकित उसाची देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

कळस : इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्या हंगामातील ऊस बिलाची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा धारण करत काटा बंद आंदोलन केले. बिलांची रक्कम दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला. मात्र कारखाना प्रशासन व आंदोलक शेतकरी यांची पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन कारखान्यांनी थकित उसाची देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.  

इंदापूर, कर्जत, माढा, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. काही शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेत काटा बंद केला. ऊसाचे पहिले बिल तसेच एफआरपी न दिल्याने आंदोलन करण्यात आले. मागणी अर्ज करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तर निर्णय झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. 

काही शेतकऱ्यांना उसाच्या रकमेचे चेक देण्यात आले होते. मात्र रक्कम नसल्याने चेक बाऊन्स झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम कारखान्याचा गाळपाचा दुसरा हंगाम सुरू झाला तरी न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांच्या रागाचा उद्रेक झाला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणासाठी पैसे नसल्याचे सांगितले.

त्यामुळे नुकत्याच कारखान्याच्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. कारखान्याने एफआरपीची उर्वरित रक्कम तसेच पहिल्या हप्ताची राहिलेली रक्कम दिवाळीपूर्वी सोडणे गरजेचे होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे विलंब झाल्याने  शेतकर्‍यांनी सहनशीलता संपल्याने उद्रेक झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी कारखाना प्रशासन व आंदोलक यांची बैठक घेऊन चर्चा केली. अखेर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असून कारखान्यांनी थकित उसाचे देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन कार्यकारी संचालक यांनी दिले आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरSugar factoryसाखर कारखानेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलFarmerशेतकरी