शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मुख्यमंत्री असले म्हणजे काय झाले, नियम सर्वांनी पाळले पाहिजेत- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 20:02 IST

अजित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका...

बारामती : आम्ही जेव्हा पदावर असतो, तेंव्हा आम्ही नियम मोडून चालत नाही. नियमाने रात्री दहाच्या पुढे लाऊड स्पीकर बंद ठेवणे आवश्यक आहे. मात्र, मुख्यमंत्री फिरत असताना रात्री दीड- दोन वाजेपर्यंत स्पीकर चालू असतो. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारी अधिकारी व्यक्तीच जर नियम मोडत असेल तर कसे चालेल, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उशीरापर्यंत होत असलेल्या दौऱ्याबाबत  टोला लगावला.

सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष गट वाढवण्याचे अधिकार आहे. मात्र, संविधानाने सांगितलेल्या अधिकाराप्रमाणे त्याचे पालन केले पाहिजे. मग ती सामान्य व्यक्ती असो की उच्चपदस्थ, प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.

पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याचा कारभार करीत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत. या दोघांवर इतका भार आला आहे की मुख्यमंत्री आजारी पडायला लागले आहेत. हे मी चांगल्या भावनेने नमुद करत आहे. यात कोणतेही राजकारण नसल्याचे पवार म्हणाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता तर कामाची वाटणी झाली असती. संबंधित मंत्री आपापल्या भागात काम करत राहिले असते. पूर परिस्थितीच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सचिव आम्हाला आदेश पाहिजे, असे सांगतात. मात्र आदेश देणाऱ्या सर्व खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अद्याप कुठलेही खाते नसल्याचे पवार यांनी सांगितले....त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले की न सांगितलेलं बरंकदाचित याबाबत निकाल काय लागेल माहित नसल्याने मंत्री मंडळ विस्तार होत नाही की काय अशी शंका येत असल्याचे सांगितले. बंड केलेल्या आमदारांनाही तुम्हाला मंत्री करतो, असे सांगितले असावे. त्यामुळे देखील विस्तार होत नसेल. त्यामुळे कोणाला मंत्री, कोणाला राज्यमंत्री तर भाजपच्या ही १०६ आमदारांना वाटतं की आपल्यालाही मंत्रिपद मिळायला पाहिजे. एक तर त्यांना मुख्यमंत्रीपद नसल्यामुळे त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले की न सांगितलेलं बरं, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

...त्यांना निवडणुक खर्च कसा परवडणारराज्यातील काही बाजार समित्यांची फी भरण्याचीही ऐपत नाही. राज्यातील ६० ते ६५ टक्के बाजार समित्यांना पगार देताना ओढाताण करावी लागते. त्या बाजार समित्या निवडणुक खर्च कसा भागविणार, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. याबद्दल सभागृहात मत मांडणार असल्याचे देखील पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेCrime Newsगुन्हेगारी