शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ते दिल्ली विशेष रेल्वेला लागले ३६ तास; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दीड हजार रसिक रेल्वेने पोचले दिल्लीत

By श्रीकिशन काळे | Updated: February 21, 2025 16:33 IST

पुण्यातून रसिक व साहित्यिकांसाठी विशेष रेल्वे बुक केली होती. ती रेल्वे बुधवारी पुण्यातून निघाली आणि शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता दिल्लीत पोचली.

पुणे : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून बुधवारी (दि. १९) दुपारी ३ वाजता सुटलेली विशेष रेल्वे नवी दिल्लीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता पोचली. तब्बल ३६ तासांचा प्रवास करून साहित्यिक रात्री दिल्लीत पोचले आहेत. प्रवासादरम्यान सर्व सोयी-सुविधा दिल्याने साहित्यिकांना कसलाही त्रास झाला नाही.

दिल्लीत ७० वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होत आहे. शुक्रवारी (दि.२१) दुपारी उद्घाटन झाल्यानंतर २३ फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन तालकटोरा स्टेडियममध्ये रंगणार आहे. यासाठी पुण्यातून रसिक व साहित्यिकांसाठी विशेष रेल्वे बुक केली होती. ती रेल्वे बुधवारी पुण्यातून निघाली आणि शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता दिल्लीत पोचली. त्यामुळे सर्व रसिक, साहित्यिकांना रेल्वेमध्ये ३६ तास घालावे लागले. यंदा रेल्वेमध्ये साहित्ययात्री संमेलन आयोजित केल्याने कोणीही कंटाळले नाही. रेल्वेमध्ये विविध उपक्रम राबविले गेले. तसेच सरहद संस्थेकडून रेल्वेमध्ये स्वयंसेवकांची खास फौज होती. त्यांनी सर्वांना पाणी, नाश्ता व इतर सोयी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे कोणाचीही गैरसोय झाली नाही, अशा भावना साहित्यिकांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, घुमानला जातानाचा अनुभव हाताशी असल्याने आयोजकांनी या वेळी विशेष खबरदारी घेतली होती. घुमानच्या वेळी रेल्वेमध्ये प्रचंड गैरसोय पहायला मिळाली हाेती. पण यंदा ती गैरसोय होऊ दिली नाही.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmarathiमराठीMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन