शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर न भरल्यास जप्ती, आळंदी नगरपरिषदेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:35 IST

आळंदी नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांनी नगर परिषदेने दिलेल्या देयकाप्रमाणे तत्काळ करांचा भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे; अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे.

आळंदी - आळंदी नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांनी नगर परिषदेने दिलेल्या देयकाप्रमाणे तत्काळ करांचा भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे; अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे.आळंदी नगर परिषदेने नागरिकांना विहित मुदतीत करदेयके दिलेली असून, नागरिकांनी करभरणा करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापुढील काळात थकीत करांच्या वसुलीसाठी तीव्र व सक्तीची वसुली मोहीम राबविली जाणार आहे. सक्तीची वसुली टाळण्यासाठी नागरिकांनी करदेयकांप्रमाणे करांचा भरणा करावा; अन्यथा शहरातील वसुली मोहिमेत नळजोड बंद करण्यासह मालमत्ता जप्त करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.यापूर्वी नगर परिषदेने जनजागृती करून मोहिमेस गती दिली आहे. दोन चतुर्थ वार्षिकीअंतर्गत २.२८ टक्के एकत्रित मिळकत करात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.सन २०१६-१७मध्ये १ कोटी ५० लाख ९९ हजार ३२५ रुपये चालू मागणी होती. सन २०१७-१८मध्ये ३ कोटी ४४ लाख ८१ हजार १८० रुपये एकत्रित मिळकत कराची मागणी होती.यात मागील वर्षीची दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सन २०१६-१७मधील थकीत करात ५० लाख ६२ हजार ३११ रुपये असून, त्यातील १३ लाख २० हजार ८६५ रुपये वसूल झाल्याचे त्यांनी सांगितले. सन २०१७-१८मधील चालू मागणीतील १ कोटी ९३ लाख ६६ हजार ८०३ रुपये अशी ५२ .०१ टक्के वसुली झाली आहे.याशिवाय, पाणीपट्टी कराची १ कोटी २८ लाख १७ हजार ५५४ रुपये मागणी आहे. यातील ३३ लाख ८२ हजार ७४२ रुपये वसूल झाले आहेत. थकबाकीदार नागरिकांनी तत्काळ उर्वरित करभरणा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे.वसुली मोहिमेत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी करांचा भरणा करून विकासकामांना सहकार्य करण्यासह सक्तीची वसुली टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सक्तीच्या मोहिमेत नळजोड बंद करण्यासह मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे.देयकाच्या ५० टक्के करांचा भरणा करावाज्या नागरिकांना देयके अदा करण्यात आलेली आहेत; मात्र करदेयके मान्य नसतील अशा मालमत्ताधारकांनी देयकाच्या ५० टक्के करांचा भरणा करून दुसरे अपील २५ एप्रिलपर्यंत दाखल करावीत, अन्यथा, यानंतर आलेल्या अपिलांचा विचार केला जाणार नाही.

टॅग्स :TaxकरAlandiआळंदीAlandi Nagar Parishadआळंदी नगर परिषदPuneपुणे