शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

राज्यातील सर्व विद्यापीठांनी एकसमान परीक्षा पद्धतीचे पालन करावे, उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 19:35 IST

सर्व विद्यापीठांनी एकसमान परीक्षा पद्धतीचे पालन करावे, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत...

पुणे : राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये एकसमानता असावी, वेळेवर निकाल लावावे. देशातील इतर सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी आणि परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे. विद्यार्थी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्यातील ११ विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मदतीने कल्पेश यादव यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. सोमवारी (दि. ३०) रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. सर्व विद्यापीठांनी एकसमान परीक्षा पद्धतीचे पालन करावे, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरूंना भेटून निवेदन दिली आहेत. आंदोलने केली. पण अनेक विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये याचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर विद्यार्थी संघटनांनी संबंधित संस्थांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. पण ही मागणी मान्य न झाल्याने विद्यार्थी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, असे याचिकाकर्ते कल्पेश यादव आणि प्रा. बालुशा बाशल यांनी सांगितले.

राज्यातील सर्व विद्यापीठांनी, शिक्षणमंत्री आणि सर्व विद्यापीठांच्या कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे परीक्षा पद्धतीचे एकसमान पालन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच याचिकाकर्त्यांनी सरकारला यासंदर्भात निवेदन पाठवावे आणि १ जून रोजी बैठक घेऊन सरकारने त्यावर निर्णय घ्यावा, अशी सूचना देखील न्यायालयाने केली आहे. तसेच सरकारच्या निर्णयाचे विद्यापीठांनी पालन करावे असे निर्देशही दिले आहेत.

- कल्पेश यादव, राज्य सहसचिव, युवासेना

सर्व कुलगुरुंनी एकमताने जे ठराव मान्य करत परीक्षांचे नियोजन करण्याचे निश्चित केले होते. मात्र, विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये एकसमानता येत नव्हती. प्रत्येक विद्यापीठ स्वतंत्र निर्णय जाहीर करत होते. राज्यातील ११ विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या मदतीने कल्पेश यादव यांच्या पुढाकारातून आम्ही न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. न्यायदेवतेने याचा विचार करून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

- प्रा. बालूशा भासल, याचिकाकर्ते

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय