शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बियाणे, खते विक्री कायद्यातील सुधारणा खंडणी वसुलीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप

By नितीन चौधरी | Updated: November 20, 2023 15:32 IST

सुधारित कायदा आल्यास ७० हजार दुकानदार अडचणीत...

पुणे : “राज्य सरकार बियाणे आणि खते विक्रीसंबंधीच्या कायद्यात सुधारणा करणार आहे. या कायद्यात सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना कारवाईच्या कक्षेतून बाजूला ठेवून बनावट, नकली बियाणे, खते विक्रीप्रकरणी केवळ विक्रेत्यांनाच दोषी धरून त्यांच्यावर सराईत गुंडांसारखी कारवाई प्रस्तावित केली आहे. विक्रेते, उत्पादक कंपन्यांकडून खंडणी वसुलीसाठीच हा कायदा आणला जात आहे,” असा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, राधाकृष्ण गडदे, पांडुरंग रायते उपस्थित होते. ते म्हणाले, “हा कायदा येत्या अधिवेशनात पारित झाल्यास राज्यातील ७० हजार कृषी बियाणे, खते विक्रेते अडचणीत येणार आहेत. त्यांनी बियाणे, खते विक्री बंद केली तर शेतकरी अडचणीत येईल. या दुकानदारांनी त्यांचा व्यवसाय बंद केल्यास शेतकरी अडचणीत येतील. तसेच या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास संबंधितांना जामीन मिळणार नाही. यामुळे दुकानदार व्यवसाय करणार नाहीत. या प्रस्तावित कायद्याच्या भीतीपोटी अनेक कंपन्यांनी राज्यात व्यवसाय करणार नसल्याचे पत्र संघटनेला दिले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर कृषी विभागाकडूनच चौकशी केली जाणार आहे. वास्तविक अशा प्रकरणांमध्ये कृषी विभागालाही जबाबदार धरण्याची तरतूद पूर्वीच्या कायद्यात होती. मात्र, नव्या कायद्यानुसार कृषी विभाग चौकशी करणार असल्यास त्यांना रान मोकळे होऊन त्यातून खंडणी वसुलीचे प्रकार होण्याची शक्यता जास्त आहे.”

या कायद्याला विरोध म्हणून राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते ५ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणखीनच हाल होतील. म्हणून हे सरकारच बदलावे लागेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड