शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

...त्यामुळे अमेरिका भारताकडे गांभीर्याने पाहू लागली; माजी राजदूतांनी उलगडले गुपित

By श्रीकिशन काळे | Published: July 11, 2023 3:46 PM

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि सरहद यांच्यावतीने मंगळवारी दुपारी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुणे : ‘‘स्वातंत्र्यापूर्वी भारताकडे लक्ष दिले जात नव्हते. पण स्वातंत्र्यानंतर मात्र हळूहळू भारताकडे लोकांचे लक्ष जाऊ लागले. जेव्हा भारताने पोखरणला अणुचाचणी केली, त्या वेळी मात्र साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले. अमेरिकेनेही गांभीर्याने पहायला सुरवात केली. आपली वाटचाल अतिशय चांगली असून, लवकरच भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनेल,’’ असा विश्वास भारताचे माजी राजदूत नवतेज सरना यांनी व्यक्त केला.

सरना म्हणाले,‘‘स्वामी विवेकानंद यांच्यामुळे जगाला एक वेगळे स्थान मिळवून दिले. भारत अध्यात्मामध्ये उच्च स्थानावर असल्याची ओळख स्वामी विवेकानंद यांनी करून दिली. त्यानंतर १९६० मध्ये मात्र भारताकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यानंतर १९८०-९० मध्ये मात्र भारताची ओळख निर्माण होत होती. संगणक क्षेत्रातील ब्रेन म्हणूनही भारताकडे गेल्या काही वर्षांमध्ये पाहिले जाऊ लागले. पोखरणला अणुचाचणी झाल्यानंतर तर आपल्याकडे सर्वजण आदराने पाहू लागले. त्यानंतर अमेरिकेने देखील भारताला प्राधान्य दिले. कारण तेव्हा चीन हा उगवती महासत्ता समोर येत होती. त्याच्या समोर भारताला उभे करण्यासाठी आणि मोठी बाजारपेठ म्हणून अमेरिकेने भारताला पाठिंबा देणे सुरू केले. आता पंतप्रधानांनी अमेरिकेला भेट दिली आणि अनेक संरक्षण, आयात-निर्यातीबाबतच्या धोरणांवर सही केली आहे. हे भविष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.’’ पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि सरहद यांच्यावतीने मंगळवारी दुपारी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अमेरिकेमध्ये आता राजकीय व्यक्ती म्हणून देखील भारतीय लोकं कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेच्या उच्च पदांवर भारतीय व्यक्तींनी स्थान मिळविले आहे. हे भारतीय गुणवत्तेचे यश आहे.- नवतेज सरना, भारताचे माजी राजदूत 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड