शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारची ट्रिपल वसूली सुरू; खा. अमोल कोल्हेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 15:30 IST

मुंबईत प्रवास करीत असताना सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडविली...

नारायणगाव (पुणे) : प्रत्येक चौकात २५ हजार रूपयांची दंड वसुली आणि २० वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, असं 'टारगेट' महिला पोलीस भगिनींना देण्यात आलेले दिसले, टार्गेट देऊन वसुली केली जात असेल तर खेदानं म्हणावे लागेल “ ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं, त्याची ट्रिपल वसूली चालू आहे ” अशी उपरोधिक टीका खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकमतशी संवाद साधताना केली आहे.

मुंबईत प्रवास करीत असताना सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडविली. त्यांनी ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेतली. यावेळी त्या भगिनीने थेट तिच्या मोबाईलवरील मेसेजच दाखवला मेसेजमध्ये “प्रत्येक चौकात २५ हजार रुपयांची वसुली आणि २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असं 'टारगेट' या भगिनींना देण्यात आलेले दिसले. उन्हाळा असो वा पावसाळा, थंडी या सर्व ऋतूमध्ये तसेच दिवसभर प्रदूषणात वाहतूक नियमांनाच कर्तव्य करणाऱ्या वाहतूक पोलिसांना 'टारगेट' का? असा सवाल करून त्यांनी वसुलीचा आकडा सादर करून 'टारगेट'चे रहस्य मांडले.

आता आपण एक छोटे गणित करुयात...

मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५०००×६५२ =  १,६३००००० रुपये प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १ कोटी ६३ लाख रुपयांची वसूली केली जाते. यामध्ये इतर शहरांच्या वसूलीचा आकडा धरलेलाच नाही बरं का? हे नेमकं काय आणि कशासाठी सुरु आहे? अशा पद्धतीने टारगेट देऊन सर्वसामान्य जनतेची लूट का केली जातेय याबाबत संबंधित मंत्री महोदय किंवा अधिकाऱ्यांनी खुलासा केलाच पाहिजे. वाहतूक शाखा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीचा अड्डा बनलीय का? याची जनतेला माहिती मिळायलाच हवी, असे प्रतिपादन ही खा. कोल्हे यांनी केला.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेtraffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेस