शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

संतप्त नीरादेवघर धरणग्रस्तांनी पाणी रोखले

By admin | Published: November 23, 2015 12:54 AM

नीरादेवघर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंर्दभात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने रविवारी नीरादेवघर धरणातून सिंचनासाठी खाली सोडलेले

भोर : नीरादेवघर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंर्दभात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने रविवारी नीरादेवघर धरणातून सिंचनासाठी खाली सोडलेले पाणी व सुरू असलेले उजव्या कालव्याचे काम नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन शेतकरी संघटनेने बंद केले. आक्रमक झालेल्या धरणग्रस्तांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला आहे. सकाळी आठ वाजता पाटबंधारे विभागाकडून नीरादेवघर धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले होते. ते पाणी नीरा नदीने आपटी गावापर्यंत आल्यावर धरणग्रस्तांच्या लक्षात आल्यावर संघटनेचे अध्यक्ष बाळासोा मालुसरे, चिमण शिरवले, हनुमंत कंक, लक्ष्मण धामुणसे, किसन दिघे, नथू दिघे यांनी धरणातून सोडलेले पाणी बंद केले. आमच्या मागण्यांची पूर्तता करा, मगच पाणी खाली सोडा, अशी मागणी त्यांनी केली.२६ आॅक्टोबरला विविध मागण्यांसाठी नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने धरणावर काम बंद आंदोलन करण्यात आले. त्या वेळी पाटबंधारे विभागाकडून मागण्यांसंदर्भात ५ नोव्हेंबरला पुण्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी व संबंंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे लेखी कार्यकारी अभियंता पवार यांनी दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र ती बैठक झालीच नाही. ती पुढे ढकलून १९ नाव्हेंबर तारीख देण्यात आली. तीही बैठक झाली नाही. वीस वर्षांपासून नीरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. धरणग्रस्तांची फसवणूक झाली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.