शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

शालेय नाटकांमध्येच बहरला अभिनयाचा ‘अंकुर’; FTII चा विद्यार्थी ‘बंगाल १९४७’ चित्रपटात मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 18:14 IST

अंकुरने गतवर्षी जवळपास पाच हिंदी चित्रपट पूर्ण केले असून त्यातील बंगाल १९४७ हा त्याचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट

उमेश जाधव 

पुणे : सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर अभिनयाचं स्वप्न जगणाऱ्या अंकुर अरमाम यांच्यातील अभिनयाचा अंकुर शालेय जीवनातच बहरला. एफटीआयआयचा विद्यार्थी असलेला अंकुर ‘बंगाल १९४७ : ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी‘या आगामी हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आपल्या स्वप्नाच्या दिशेने टाकलेलं हे त्याचं पहिलं पाऊल ठरणार आहे.

लहान असताना शाळेत कृष्णाची भूमिका केली होती. पुढील दोन दिवस लोकांनी खूप कौतुक केलं. त्यानंतर अधिकाधिक चांगली भूमिका कशी करता येईल यासाठीच प्रयत्न केला, असे अंकुर म्हणाला. अंकुर हा मूळचा दिल्लीचा. गाझियाबादमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्याने अनेक नाटकांमध्ये काम करून वाहवा मिळवली. प्रख्यात अभिनेत्री शिल्पी मारवाह यांच्याकडून त्याने तीन वर्षे दिल्लीत अभिनयाचे धडे गिरवले.

अभिनयातील बारकावे शिकताना त्याने अनेक नाटकांमध्येही काम केलं. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या अंकुरला अभिनयाचं वेड स्वस्थ बसू देईना. चित्रपट आणि अभिनय समजून घेण्यासाठी त्यानं पुणे शहर गाठलं. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) येथे त्यानं दोन वर्षे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. अभिनय करताना चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील चढउतार, सूक्ष्म छटा, हजरजबाबीपणा, संवादफेक अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर अंकुरने मेहनत घेतली. अभिनय क्षेत्राची ही सुरुवात असून भविष्यात वेगळी उंची गाठायची आहे त्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तयारी आहे, असे अरमाम सांगतो.

बंगाल १९४७ चित्रपटात कोणती भूमिका?

अंकुरने सर्वप्रथम सोनी लिव या बहुचर्चित वेबसिरीज ‘ए सिंपल मर्डर’मध्ये दिसला. या वेबसिरीजमध्ये त्याने अतिशय महत्त्वाची आणि दमदार भूमिका निभावली होती. अंकुरने गतवर्षी जवळपास पाच हिंदी चित्रपट पूर्ण केले आहेत. त्यातील बंगाल १९४७ हा त्याचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट आहे. पुढील तीन दिवसांत रिलीज होणाऱ्या या चित्रपटाद्वारे बंगाल विभाजनाच्या वेदना मांडण्यात आल्या आहेत. १९४७ मध्ये फाळणी झाल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि एक सुंदर प्रेमकहाणी यावर आधारित हा चित्रपट आहे. अंकुरवर मोहन हे पात्र साकारण्याची जबाबदारी होती आणि ती अतिशय सहजतेने पार पाडली आहे. मोहन हा एक सुशिक्षित तरुण आहे ज्याला आपली मते आणि भावना स्पष्टपणे कशा मांडायच्या हे माहीत आहे. तो प्रामाणिक आहे आणि त्याच्याकडे प्रगतिशील मन आहे. मोहन जगाचे कायदे आणि परंपरा आणि प्रस्थापित निकषांचे प्रश्न सखोलपणे समजून घेण्यावर विश्वास ठेवतो. तो जात, रंग, वंश किंवा सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीच्या आधारावर कोणाचाही न्याय करत नाही. चित्रपटात देवोलिना भट्टाचार्जी, सोहेला कपूर, ओंकार दास माणिकपुरी, आदित्य लखिया, अनिल रस्तोगी, प्रमोद पवार, सुरभी श्रीवास्तव, फलक राही, विक्रम टीडीआर आणि अतुल गंगवार यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

लहान असताना नाटकांमध्ये सर्वोत्तम काम करण्यावर भर असायचा; पण करताना अभिनय कधी आणि कसा आवडू लागला हे कळलंच नाही. दिल्लीत सुरुवात केली आणि पुण्यात अभिनयाचे अनेक पैलू उलगडण्यास मदत झाली. त्यामुळेच ‘बंगाल १९४७“ या चित्रपटात मुख्य भूमिका करू शकलो. भविष्यात अनेक भूमिका गाजवण्यासाठी सज्ज आहे. - अंकुर अरमाम, अभिनेता.

टॅग्स :PuneपुणेartकलाcinemaसिनेमाFTIIएफटीआयआयStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय