शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

ऐन दिवाळीत दुष्काळाने हिरावला त्यांचा भाकरीचा चंद्र

By admin | Published: November 10, 2015 1:54 AM

सलगच्या दुष्काळाने गावे तर मोडून पडली आहेतच, पण ज्ञानाच्या दिव्याने अंधारलेल्या परिस्थितीवर प्रकाश शोधणाऱ्या विद्यार्थ्यांवरही संकट कोसळले आहे.

सुषमा नेहरकर-शिंदे, पुणेसलगच्या दुष्काळाने गावे तर मोडून पडली आहेतच, पण ज्ञानाच्या दिव्याने अंधारलेल्या परिस्थितीवर प्रकाश शोधणाऱ्या विद्यार्थ्यांवरही संकट कोसळले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना दररोज पोटभर जेवण करणेही शक्य होईनासे झाले आहे. एक वेळचेच जेवण तेदेखील मैत्रिणींसोबत डबा शेअर करून घेणेच त्यांना परवडत आहे. लातूर, नगर, सोलापूर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील या विद्यार्थिनी आहेत. सगळ्या जणी पोस्ट ग्रॅज्युएशन करीत असून, त्याबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. आत्तापर्यंत आई-वडील पोटाला चिमटा काढून कसेबसे पैसे पाठवीत होते. पण, दुष्काळाने त्यांनाच मोडून टाकल्याने घर चालविण्याची पंचायत. त्यामुळे मुलीला उचलून पैसे देणेच शक्य होईनासे झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींचे हाल सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काकणेवाडीची संगीता वाळुंज एमएससी स्टॅटिस्टिक्स करत आहे. मागील वर्षी ८९ टक्के गुण मिळविले; मात्र खुल्या प्रवर्गात असल्याने शिष्यवृत्ती नाही. त्यामुळे घरून येणाऱ्या पैशावरच शिक्षण घ्यावे लागत आहे. संगीता म्हणाली, ‘‘गावाकडे सलग तीन वर्षांचा दुष्काळ आहे. वडिलांची पोटापुरती शेती... पण त्यातही काही उगवले नाही. त्यांनाच घर चालवायची भ्रांत, तर मी पैसे कसे मागायचे. त्यामुळे मी एक वेळच जेवण करते. भूक लागली तर मैत्रिणीच्या डब्यात शेअर करतेय.’’ श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमालाची वैशाली मुल्ला रसायनशास्त्रात एमएससी करतेय. गेल्या वर्षी ८१ टक्के गुण मिळाले. तिलाही दुष्काळामुळे गेल्या काही दिवसांपासून पैसे येणेच बंद झाले. होस्टेलची फी भरायलाही पैसे नाहीत... एक वेळ जेवण करून दिवस काढायचे. संगीता आणि वैशालीसारखीच अनेकींची स्थिती आहे. पुण्यात रहाणे, जेवण व किरकोळ खर्चच ३ ते ४ हजाराच्या घरात जातो. त्यात परीक्षा फी, प्रोजेक्ट, नोट्स, पुस्तके याचा खर्च वेगळा येतो. तो टाळता येत नाही. त्यामुळे एक वेळ जेवण करूनच पैसे वाचवावे लागतात.