शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारतीय संस्कृतीत जगातील सर्व प्रश्नाचे उत्तर; डॉ. मोहन भागवत यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 10:06 IST

सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असून ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतो

पुणे: समाज आणि मनुष्य केंद्रस्थानी ठेवून जागतिक पातळीवर अंतिम सुखाच्या शोधासाठी प्रयत्न झाले, तसेच विज्ञान केंद्रस्थानी ठेवून प्रयोग केले गेले तरीही अंतिम सुख सापडलेले नाही. या सर्व मंथनातून जे अमृत निघाले त्याचा लाभ घेणाऱ्यांनी घेतला. पण जे हलाहल बाहेर पडले ते पचवण्याची ताकद कोणाचीच नाही. ती ताकद केवळ भारतीय संस्कृतीत आणि भारतीय अध्यात्मात आहे. जगातील सर्व प्रश्नाचे उत्तर भारतीय संस्कृतीत आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

'प्रसाद प्रकाशना'च्या अमृतमहोत्सवाचा सांगता समारंभ आणि ग्रंथ प्रकाशनप्रसंगी ते बाेलत होत. यावेळी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. उमा बोडस आदी उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले की, सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असते. ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत असतो. परंतु या धावपळीत ज्या शाश्वत सुखाचा तो पाठलाग करीत असतो, ते सुख निसटते. ज्ञान, सुख आणि समृद्धी वाढली तरी अपूर्णतेची एक जाणीव आणि बोच सदैव जाणवत राहिली.

मुनगंटीवार म्हणाले की, आपली संस्कृती ही प्रश्न निर्माण करणारी नसून उत्तरे शोधणारी आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत चालला आहे, परंतु आनंदाचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचा सर्व स्तरावर ऊहापोह, चर्चा आणि अभ्यास होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात पहिल्या दहांमध्ये येतो. आता या संस्कृतीवर आक्रमण होत आहे. सोशल ॲनिमलपासून सेल्फीश ॲनिमल असा मनुष्यजातीचा प्रवास येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतcultureसांस्कृतिकSocialसामाजिक