शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

गावविकासाचे आत्ताच करा नियोजन

By admin | Published: December 16, 2015 3:27 AM

पुणे जिल्हा परिषदेला १४ व्या वित्त आयोगातून सुमारे ९५ कोटींचा निधी मिळणार असून आताच आपल्या गावाचा पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे

पुणे : पुणे जिल्हा परिषदेला १४ व्या वित्त आयोगातून सुमारे ९५ कोटींचा निधी मिळणार असून आताच आपल्या गावाचा पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले आहे. आराखड्यात जी कामे आताच दिली जातील तीच कामे पुढील काळात होणार आहेत.केंद्र शासनाने वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी आता थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ‘आमचा गाव आमचा विकास’ हा उपक्रम ग्रामविकास विभागाने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील पाच वर्षांचे गावांचे विकास आराखडे तयार करण्यास कळविले आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेने गावांचे विकास आराखडे तयार करण्यास सांगितले आहे. गावात काय पाहिजे, कशाची गरज आहे, याचा विचार करून ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन पुढील पाच वर्षांच्या गाव विकासाचे नियोजन यात करावयाचे आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी राहणार असून यात प्रस्तावीत केलेली कामेच करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त कोणतेही काम करायचे असेल तर त्याची जिल्हा परिषदेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आताच काय करायचे ठरवावे लागणार आहे. याचे ग्रामपंचायत विभागात एक रजिस्टर तयार करण्यात येणार असून यानुसारच कामे होत आहेत किंवा कशी, यावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. प्रत्येक गावपातळीवर एक चर्चा आॅफिसर म्हणून विस्तार अधिकारी राहणार आहे. ते त्या त्या गावांचा आराखडा तयार करून गटविकास अधिकाऱ्यांना देणार आहेत. दोन महिन्यांची मुदत देण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सांगितले. लवकरच गटविकास अधिकाऱ्यांची या संदर्भात एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)शाश्वत विकास : असे असेल आराखड्यातील खर्चाचे नियोजन मानव विकास निर्देशांक विकसित करणे : कामांची निवड करताना आरोग्य शिक्षण रोजगार निर्मिती अनु जाती/जमाती, महिला व बालक इत्यादी मानव विकास निर्देशांक विकसीत करणाऱ्या कामांना प्राधान्यप्राधान्यक्रम ठरविण्याचे कौशल्य विकसन : अपेक्षित उत्पन्नाचा विचार करुन कामे प्रास्तावित करणे. तसेच स्थानिक गरजांचा आवश्यक तो प्राधान्यक्रम ठरविणे यास्तव तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्फत ग्रामस्थांचे कौशल्य विकसित करणे.विविध केंद्र व राज्य शासनांच्या योजनांची सांगड घालणे : केंद्र व राज्य योजनांची एककेंद्रभिमुखता साधून विद्यमान योजनांमधून योजनेचे निकष पाळून हाती घेण्यात यावीत.शास्वत विकासाची कामे हाती घेणे : कामे घेताना शास्वत विकास व उत्पन्न वाढीसाठी मदत होईल, अशी कामे हाती घेणे.९५ कोटींचा निधीया योजनोसाठी चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्यापोटी ४७,६४,७५000 इतका निधी जिल्हा परिषदेकडे जमा असून डिसेंबर १५ मध्ये दुसऱ्या हप्त्यापोटी ४७,६४,७५000 इतका निधी मंजूर झाला आहे.दोन्ही हप्ते मिळून ९५ कोटी २९ लाख ५0 हजारांचा निधी जिल्हा परिषदेला मिळणार आहे. सदसरचा निधी ग्रामपंचायतीची लोकसंख्येच्या ९0 टक्के तसेच एकूण क्षेत्रफळाच्या १0 टक्के या प्रमाणात वितरीत केला जाणार आहे. १ जानेवारीपासून या योजनेला सुरूवात होणार असून गावपातळीवर लोकसंख्या हा निकष असून २३६ रुपये प्रतिव्यक्ती अशी रक्कम मिळणार असून २०११ लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे. - कांतीलाल उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद