शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Railway: विनाकारण रेल्वेची चेन ओढणे पडले तब्बल पावणेतीन लाखांना, ७९३ जणांवर गुन्हे दाखल

By अजित घस्ते | Updated: December 9, 2023 18:48 IST

त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे....

पुणे :रेल्वेचा प्रवास करताना अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे थांबविण्यासाठी प्रत्येक डब्यात अलार्म चेन असते. आपत्कालीन काळातच ही चेन ओढण्याची परवानगी आहे. परंतु काही प्रवासी किरकोळ कारणांसाठी विनाकारण चेनचा वापर करून व्यत्यय आणल्याचे प्रकार आढळले आहेत. यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या दहा महिन्यांत मध्य रेल्वे विभागात ७९३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेतून प्रवास करताना जीवघेणा प्रसंग उद्भवल्यास किंवा अपघात, आग लागणे अशावेळी प्रवाशांच्या जीविताला धोका होऊ नये, यासाठी अलार्म चेन ओढून रेल्वे थांबविण्यासाठी ओढली जाते. परंतु काही प्रवासी विनाकारण किरकोळ कारणासाठी मुद्दामहून चेन ओढतात. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. परिणामी गाडी थांबल्यामुळे मागच्या गाड्यांना उशीर होतो. त्यामुळे वेळेत पोहोचण्यासाठी विलंब होतो. काही प्रवाशांना स्टेशनवर पोहोचायला उशीर झाल्यामुळे गाडी थांबविण्यासाठी अलार्म चेन ओढले जातात. यामध्ये दिवाळीच्या काळात नोव्हेंबर महिन्यात याचे प्रमाण जास्त झाले होते. यामुळे एका महिन्यात १९७ गाड्या उशिराने धावल्या. यात मुंबई विभागात ७३ मेल/एक्स्प्रेस, भुसावळ-५३, नागपूर-३४, पुणे-३० आणि सोलापूर विभागात ८ गाड्यांना फटका बसला. अशा प्रवाशांवर रेल्वेच्या कायद्यानुसार कलम १४१ अन्वये कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे