शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

पालखी सोहळ्यात ‘अश्व’ वैभव

By admin | Published: July 07, 2015 2:57 AM

श्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसह त्यामधील लवाजम्यामुळे सोहळ्याला तितकीच भव्यता प्राप्त झाली आहे.

मंगेश पांडे पिंपरीश्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसह त्यामधील लवाजम्यामुळे सोहळ्याला तितकीच भव्यता प्राप्त झाली आहे. याच सोहळ्यातील अश्व म्हणजे सोहळ्यातील वैभवतेचे प्रतीक मानले जाते. आषाढी वारीसाठी पंढरीला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात काळानुरूप बदल होत गेले. सुरुवातीला काही भाविकांसह पालखी पंढरीला नेली जात होती. चौघडागाडी, चोपदार, अश्व, हत्ती असा लवाजमा वाढत गेला. सोहळा अधिकाधिक भव्य कसा होईल, यासाठी संस्थानने पावले उचलली. सोहळ्यात सहभागी होत असलेल्या अश्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अश्व म्हणजे वैभवतेचे प्रतीक मानले जाते. सध्या सोहळ्यातही दोन अश्व आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील पेठ बाभूळगाव येथील अश्व आहे. परंपरेप्रमाणे अनेक वर्षांपासून हा अश्व सोहळ्यात आहे. यावर तुकाराममहाराज स्वार असल्याचे मानले जाते. हा अश्व विनायक रणेर-बाभूळगावकर यांच्या मालकीचा असून, ते हा अश्व घेऊन येतात. यापूर्वी त्यांचे वडील नारायण रणेर घेऊन येत. पूर्वी हा अश्व बाभूळगावहून देहूला पायी आणला जात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बाभूळगाव ते पंढरपूरपर्यंत अश्व वाहनाने आणतात. त्यानंतर पंढरपूरहून देहूपर्यंत हा अश्व पायी आणला जातो. अश्वासोबतच बाभूळगावातील माई दिंडीतील भाविक असतात. प्रस्थान सोहळ्याच्या बारा दिवस अगोदर अश्व व माई दिंडी पंढरपूरहून देहूकडे मार्गस्थ होतात. परंपरेनुसार अनेक वर्षांपासून बाभूळगावकरांचा अश्व सोहळ्यात सेवा देत आहे. तुकोबाराय स्वार असल्याचे मानले जात असल्याने या अश्वाला ‘देवाचा अश्व’ असेही संबोधले जाते. या सोहळ्यात आतापर्यंत चार अश्व झाले. वयोमानानुसार ठरावीक कालावधीनंतर अश्व बदलण्यात आले. विशेष म्हणजे बाभूळगावकरांनी चारही अश्वांचे नाव ‘राजा’ हेच ठेवले. सध्याच्या अश्वाचे नावही ‘राजा’च आहे. सोहळ्यातील दुसरा अश्व अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील यांचा असतो. १९८३पासून हा अश्व सोहळ्यात दाखल झाला. दोन्ही अश्व प्रस्थान सोहळ्याच्या आदल्या दिवशी देहूत दाखल होतात.