शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

साहित्य संमेलन : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्कटदाबी विरोधात असीम सरोदे, विश्वंभर चौधरी बसणार उपोषणाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 20:04 IST

विविध माध्यमातून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्कटदाबीचा थेट सामना करण्यासाठी मानवी हक्क विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे : यवतमाळ साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्याने सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. याबाबत विविध माध्यमातून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्कटदाबीचा थेट सामना करण्यासाठी मानवी हक्क विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. राजकीय व्यवस्था, आयोजक, भूमिका न घेणारे साहित्यिक अशा घटकांचा निषेध नोंदवण्यासाठी संमेलनस्थळी एकदिवसीय उपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. संमेलनावर बहिष्कार टाकण्याऐवजी तेथे जाऊन कृती कार्यक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. संमेलनाच्या मंडपात उपोषणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी साहित्य महामंडळाकडे केली आहे. एक दिवसाचे उपोषण आणि मौन सत्याग्रह असे या कृती कार्यक्रमाचे स्वरुप असेल.

             याबाबत ‘लोकमत’शी बोलताना विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘राजकारणमुक्त साहित्य व्यवहार निर्माण व्हायचा असेल, तर त्याला पोषक परिस्थिती कधी निर्माण होणार? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि झुंडशाहीला आळा घालण्यासाठी आम्ही कृती कार्यक्रमाचा निर्णय घेतला आहे. याविरोधात पुढचे पाऊल काय असणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. संयोजकांचा निषेध म्हणून आम्ही मंडपात आत्मक्लेश करणार आहोत. यातून कोणतीही चमकोगिरी करण्याचा हेतू नाही. प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. यावेळी निषेधाची पत्रके वाटली जातील. यातून राजकीय पक्षांना आणि संयोजकांना धडा शिकवला जाणार आहे. साहित्यिकांना स्वत:च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना करता येत नसेल तर शारदेचा उत्सव केवळ नावापुरता राहिल, हा संदेशही कृती कार्यक्रमातून दिला जाईल.’

              अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, ‘आयोजकांनी आमंत्रण मागे घेऊन मोठी चूक केली आहे. या चुकीचे प्रायश्चित्त घ्यावे, असे आयोजकांना वाटत नाही. दबाव निर्माण करुन आपण मोठी चूक केली आहे, असे राजकीय नेत्यांनाही वाटत नाही. उदघाटनाला कोणाला बोलवायचे, बोलवायचे की नाही, या सर्वस्वी आयोजकांचा अधिकार आहे. मात्र, एकदा आमंत्रण दिल्यावर विशिष्ट राजकीय कारणांमुळे ते मागे घेऊन अपमानित करणे दुर्देवी आहे. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यच समजून घेतले नाही, तर लोकशाही कशी समजून घेणार, हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही दोघांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.’

            प्रत्येकाने अशा पध्दतीने कृतीतून निषेध नोंदवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांना कळवण्यात आले आहे. ‘आम्ही दोघे जण साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमस्थळी बाहेर बसून एक दिवसाचे निषेध उपोषण आणि संध्याकाळी उपोषण सुटेपर्यंत मौन सत्याग्रह करण्याचे जाहीर करीत आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येणा-या प्रवृत्ती विरोधात हे आंदोलन आहे’, असे त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकYavatmalयवतमाळ