शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पुण्यात आसूड मोर्चा; बळीराजाने व्यक्त केला सरकारी धोरणांचा निषेध

By नितीन चौधरी | Updated: February 29, 2024 16:35 IST

शेतकरी संघटनेतर्फे पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला

पुणे : कांदा, साखर आणि सर्व शेती मालावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी तसेच सरकट कर्ज आणि वीजबील मुक्ती मिळावी, यासह इतर मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यासाठी आज शेतकरी संघटनेतर्फे पुणे येथे भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला. पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी अंगावर आसूड ओढून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

या मोर्चाला शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते, बाळासाहेब घाडगे, पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वस्तादभाऊ दौंडकर, युवा आघाडी अध्यक्ष बाबासाहेब हारगुडे भगवान जगताप उपस्थित होते. या मोर्चात शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव, दौंड, जुन्नर अशा विविध तालुक्यांचे अध्यक्ष आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी राष्ट्रपतींना देण्यासाठीचे मागण्यांचे निवेदन सुपूर्त करण्यात आले. कीटकनाशके, बियाणे, ट्रॅक्टर, कृषी यंत्रे इत्यादींवरील जीएसटी हटवावा अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. तसेच व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करतात आणि त्यावरील जीएसटी शेतकऱ्यांडून वसूल केला जातो, त्याचा भार व्यापाऱ्यांनी सहन करावा, अशी तरतूद करण्यात यावी. सरकारने शेतमालाची खरेदी निश्चित करावी आणि नाशवंत उत्पादनांसह सर्व कृषी उत्पन्नांना किमान आधारभूत किंमत देण्यात यावी. अशा मागण्या त्यात करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSocialसामाजिकGovernmentसरकारMorchaमोर्चाagitationआंदोलन