शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक सिनेमांसाठी किमान अभ्यास तरी करावा- विश्वास पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 18:11 IST

बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिनानिमित्त चर्चासत्र...

पुणे : ‘मी पानिपत कादंबरी लिहायला पाच वर्षे घेतली. मात्र, त्यावरचा सिनेमा अवघ्या ११ महिन्यांत तयार झाला, मग सिनेमा चालणार कसा? बजेट मिळालं की बनवा सिनेमा असं करून चालणार नाही, त्यासाठी किमान वेळ देणे गरजेचे आहे. 'मुघल ए आझम'ची निर्मिती १२ वर्षे चालली होती. आपण ऐतिहासिक सिनेमा करताना किमान दोन-तीन वर्षे तरी अभ्यास करायला हवा’, असे मत साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महोत्सवात 'इतिहासपटांची मायंदाळी : इतिहासाचं प्रेम की व्यवसायाचं गणित?' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये पाटील, ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर, दिग्दर्शक व वितरक अनुप जगदाळे हे सहभागी होते. त्यांच्याशी राज काझी यांनी संवाद साधला. याप्रसंगी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

विश्वास पाटील म्हणाले, आज ऐतिहासिक सिनेमाची कोंडी झाली आहे म्हणायला हरकत नाही. महाभारत आणि रामायण मालिका आल्या, त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. त्यांचे लेखक हे प्रतिभावान होते. यामुळे पडद्यावर आलेले चित्रण लोकांना भावले. आज आपल्याकडे घाईत काम करायची सवय लागली आहे. परिणामी, दोन वर्षांपूर्वी ज्या दिग्दर्शकांचे कौतुक झाले, आज त्याची छी-थू होतेय ती याच कारणांमुळे. शेवटी एवढेच म्हणेन की, पेराल तसे उगवते, हे सत्य नाकारता येणार नाही.

दिग्दर्शक व वितरक अनुप जगदाळे म्हणाले, आजघडीला मोठा सिनेमा बनवणे आणि चालवणे हे मोठे आव्हान आहे. कारण पायरसी रोखणे हे सर्वांत मोठे आव्हान निर्मात्यांपुढे आहे. ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर म्हणाले, आज मराठी चित्रपटांचे भवितव्य अवघड दिसतंय. कारण पहिल्या दिवशीही प्रेक्षक येत नाहीत. ऐतिहासिक चित्रपट वाढल्याने मराठी चित्रपटांची संख्यात्मक नाही मात्र दर्जात्मक वाढ खुंटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :Panipat MovieपानिपतVishwash Patilविश्वास पाटील PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर