शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

नास्तिकांनी असे काय कोणाचे घोडे मारले? इथे सनसनाटी काही घडणार नव्हते ना! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 5:53 AM

१० एप्रिलच्या मेळाव्याला मनाई करण्याचे कारण काय, तर त्यादिवशी रामनवमी असल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी तक्रार पोलिसांकडे आली होती

१० एप्रिलला एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या नास्तिकांचा मेळाव्याला ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. तोच मेळावा त्याच सभागृहात २४ एप्रिलला शांतपणे पार पडला. या दोन्ही घटनांची समाजमाध्यमांनी फारशी दखल घेतलेली दिसली नाही आणि तेही साहजिकच आहे. इथे सनसनाटी काही घडणार नव्हते ना! 

१० एप्रिलच्या मेळाव्याला मनाई करण्याचे कारण काय, तर त्यादिवशी रामनवमी असल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. समाजाच्या धार्मिक भावना मोठ्या तरल असतात आणि त्या फट म्हणता दुखावतात, असा एक सर्वसाधारण समज आहे. मग रामनवमीनंतर दोन आठवड्यांनी या भावना बधिर किंवा बोथट झाल्या असे समजायचे का? मेळाव्यात झालेली भाषणे चिथावणी देणारी, प्रक्षोभक किंवा देव-देवतांची टिंगल-टवाळी करणारी असती तर धार्मिक भावना दुखावल्या जायला किंवा शांतता भंग करायला कारणीभूत ठरली असती; पण या मेळाव्याचे वातावरण तर एकदमच वेगळे होते. 

मेळाव्याला आलेल्या कोणाकडेही लाठ्या-काठ्या, शस्त्रे किंवा झेंडे नव्हते. कोणीही घोषणा देत आले नव्हते. कोणी गटागटाने किंवा झुंडीझुंडीने आले नव्हते. हे विवेकी लोक आपापली वाहने घेऊन किंवा रिक्षातून येत होते आणि शांतपणे सभागृहात जाऊन बसत होते. ते  जसे शांतपणे आले तसेच मेळावा संपल्यावर शांतपणे निघून गेले. कुठे गोंधळ नाही, गडबड नाही की घोषणा नाहीत. वक्त्यांनी लोकांना चिथावणी देणारी प्रक्षोभक भाषणे केली असेही काही घडले नाही. 

असीम सरोदे यांनी कायदेशीर बाबी उलगडून दाखवल्या. सोनावणे यांनी आदिमानवानंतर आलेल्या माणसाने देव कसा आणला आणि देव निर्गुण कसा आहे हे खुमासदार शैलीत सांगितले. सुनील सुकथनकर यांनी कला क्षेत्रातील अंधश्रद्धेची उदाहरणे दिली. थोर विचारवंत आणि विवेकवादी वालावलकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या सबंध कार्यक्रमात स्वतःच्या बुद्धीचा वापर, विवेक आणि विचाराला चालना देणारी भाषणे झाली. रामनवमीच्या दिवशीही असाच मेळावा पार पडणार होता; पण विवेकी विचारांवर बंधने घालून आपणच श्रीरामांच्या सर्वसमावेशक धोरणालाच अनवधानाने विरोध करतोय हे विरोधकांच्या लक्षात आले नाही.

शरद बापट, पुणे