शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

मतदानाविषयी वाढतेय तरुणाईत जागृती

By admin | Published: January 25, 2016 1:03 AM

मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल.

पुणे : मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल. हा विचार प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचविला जातो तसेच अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून व सोशल मीडियाद्वारे देखील मतदानाविषयी जागृती केली जाते. याचा परिणाम व तरुणांचा उत्साह पाहता गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आज १८ ते ३० वयोगटातील मतदान १० टक्क्यांनी वाढलेले दिसते, अशी माहिती उपनिवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी दिली.मतदानाविषयी जनजागृतीसाठी व तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंडळाच्या बैठकीत २५ जानेवारी हा दिवस मतदान दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. तसेच मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान करणे ही लोकशाहीची ताकद असते. अशा विविध विषयांवर अनेक महाविद्यालयांत मतदान हक्काविषयी व्याख्याने आयोजित करण्यात येतात. तसेच या माध्यमातून तरुण मतदारांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना मतदान करण्याचे महत्त्व कळावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो.काही सुशिक्षित वर्गामध्ये एका मताने काय फरक पडणार, हा विचार मनात बाळगून मतदानचा दिवस हा सरकारी सुट्टी म्हणून साजरा करतात. तर काही जण बाहेरगावी सहलीचा बेत आयोजित करतात. मग हाच वर्ग, मतदान न करता चुकीचे सरकार निवडून आले आहे, भ्रष्टाचार वाढत आहे असे अनेक प्रश्न या नागरिकांना पडतात. या गोष्टी टाळण्यासाठी जर प्रत्येकाने मतदाराने योग्य हक्क बजावून आणि योग्य उमेदवाराला निवडून दिले तर अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. जनतेच्या मतदानावर योग्य शासन ठरते. शेवटी जनताच सर्वश्रेष्ठ असते. कायद्याने १८ वर्षांपुढील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे.