शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी टाटांना वाहिली श्रद्धांजली; अखेरच्या निरोपासाठी भलीमोठी रांग
2
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
3
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
4
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
5
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
6
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
7
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल
8
"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले
9
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
10
Ratan Tata News : 'ही' ठरली रतन टाटांची अखेरची डील, मिळवला होता २३,००० टक्क्यांचा नफा; कोणता होता व्यवहार?
11
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
12
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
13
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
14
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
15
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
16
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
17
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
18
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
19
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
20
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई

विद्यापीठात कार्यक्रम घेण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 2:20 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अनिकेत कँटीन या परिसरात विद्यार्थ्यांनी कोणतेही

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अनिकेत कँटीन या परिसरात विद्यार्थ्यांनी कोणतेही कार्यक्रम घेण्यास अथवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आल्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला जात आहे. हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे स्पष्ट करून याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन व्यवस्थापन परिषदेचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली. यावेळी एनएसयूआयचे सतीश गोरे, एसएफआयचे सतीश देबडे, मुक्तीवादी संघटनेचे आकाश दोंडे, बीव्हीएमचे जयकर गायकवाड, राष्टÑवादी विद्यार्थी संघटनेचे नंदकुमार हिंगे, डाप्साचे अमोद सरवदे उपस्थित होते. येत्या २ दिवसांत हा निर्णय मागे न घेतल्यास याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडियाच्या वतीने (एनएसयूआय) शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनिकेत कँटीनजवळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वीच विद्यापीठातील सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी या ठिकाणी कार्यक्रम घेता येणार नाही, असे विद्यार्थ्यांना सांगितले. व्यवस्थापन परिषदेमध्ये अनिकेत कँटीनजवळ कोणताही कार्यक्रम घेण्यास मनाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद विद्यार्थ्यांमध्ये उमटले आहेत. शांततेमध्ये कार्यक्रम घेण्यासही प्रशासनाकडून अटकाव केला जात असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.अनिकेत कँटीनजवळ डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्यास उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून हुल्लडबाजी करून कार्यक्रम उधळून लावण्याचे प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे उजव्या संघटनांच्या कार्यक्रमाला दुसऱ्या संघटनांकडून विरोध केला जातो. यामुळे यातून सातत्याने वादाचे प्रसंग घडत असल्याने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास मनाईच करण्याचा उपाय विद्यापीठ प्रशासनाने शोधून काढला आहे. विद्यार्थी संघटनांची ही वर्तणूक योग्य नसून त्यांनी त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, अशी भावना प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.