शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

बारामती उपविभाग : १७.७५ टक्के पेरण्या

By admin | Published: July 07, 2015 2:48 AM

बारामती उपविभागामध्ये खरीप हंगामाच्या १७.७५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता; मात्र जूनअखेर

बारामती : बारामती उपविभागामध्ये खरीप हंगामाच्या १७.७५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता; मात्र जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने समाधानकारक पेरण्या झाल्या नाहीत. येत्या दोन ते तीन दिवसांत बारामती उपविभागात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. खरीप वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. बारामती कृषी उपविभागामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यांचा समावेश आहे. उपविभागाच्या शुक्रवारच्या (दि. ३) अहवालानुसार दौंड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ५.३५ क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. तर बारामती तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ३८.५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र सरासरीच्या तुलनेत अद्याप पेरण्या कमी आहेत. इंदापूर आणि पुरंदरमध्येही खरिपाच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांत अनुक्रमे ८.८९ आणि ७.६८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.बारामती, इंदापूर आणि पुरंदरमध्ये प्रामुख्याने खरीप हंगामात बाजरीच्या पेरण्या होतात. बारामती तालुक्यात बाजरीच्या ९१.६९ क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, तर इंदापूर आणि पुरंदरमध्ये ७.६९ व १०.३१ टक्के क्षेत्रावर बाजरीच्या पेरण्या झाल्या आहेत. बारामती तालुक्यातील जिरायती भागात प्रामुख्याने खरिपाचा हंगाम घेतला जातो. मात्र या परिसरात जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. आहे त्या पावसावर येथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार पेरण्या झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. बारामतीच्या जिरायती भागात मागील चार वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती आहे. खरिपाच्या जीवावरच येथील अर्थकारण चालते. त्यामुळे हा खरीप हंगाम तरी हाताशी लागावा असा धावा येथील शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)सुपे : सुपे परिसरामध्ये खरिपाच्या काही पेरण्या खोळंबल्या आहेत. तर, काही भागांत झालेल्या पेरण्या पावसाअभावी वाया जाण्याच्या भीती आहे. त्यामुळे येथील बाजार पेठेवरही परिणाम झाला आहे. पंधरवड्यापूर्वी झालेल्या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या सुमारे ६५ टक्के पेरण्या पूर्ण केलेल्या आहेत. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. या भागातील शेतकऱ्यांनी मागील पावसावर बाजरी, हळवी कांदा, जनावरांचा हिरवा चारा, मूग आदी पिके घेतली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्याला एकरी साडेतीन ते चार हजार रुपये मशागतीसाठी खर्च आला. पावसाअभावी हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने खरीप पिकासाठी एकरी साडेतीन ते चार हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कोळोलीचे ज्येष्ठ शेतकरी संपतराव काटे, पानसरेवाडीचे यादव कुदळे यांनी केली आहे. बोरकवाडी येथील शेतकऱ्यांनी बाजरी, हळवी कांदा आदी पिके घेतली आहेत. मात्र, मागील आठवड्यापासून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे पिकांची ओल कमी होऊ लागली आहे. तसेच दररोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे खरीप पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती बोरकवाडी येथील शेतकरी मधुकर बोरकर यांनी दिली. बारामतीचे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी यामध्ये खरीप पिके वाचविण्यासाठी पिकांवर डीएएफ फवारणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.