शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

बीड पूर्वीही सुरक्षित होते आणि आताही सुरक्षितच : चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:05 IST

बीड सुरक्षित राहील. बीडची काळजी करण्याची गरज नाही असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व राज्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनी असे करणे टाळावे. बीड यापूर्वीही सुरक्षित होते, आताही आहे आणि यापुढेही सुरक्षित राहील. बीडची काळजी करण्याची गरज नाही, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.एका कार्यक्रमासाठी बुधवारी पुण्यात आले असता बावनकुळे माध्यमांशी बोलत होते. मुंबईमध्ये अदानी कर लादला जात असल्याची टीका शिवसेनेचे (ठाकरे) युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरे काही शिल्लक नाही. ते सरकारवर बोलू शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरी बसून सरकार चालविले. ते केवळ दोन दिवस मंत्रालयात आले होते. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलावे. मोदी आणि शाह यांच्याबद्दल बोलण्याएवढी अंधारे यांची उंची नाही, असेही बावनकुळे म्हणाले.रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या वाद सुरू आहे. त्यासंदर्भात महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून लवकरच निर्णय घेतील. मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार असताना मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाला न्याय मिळावा, हीच सरकारची भूमिका आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण