शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

पुण्यात लॉकडाऊनमध्ये मधमाशींना मिळाले मुक्तसंचार करण्याचे 'स्वातंत्र्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 15:39 IST

लॉकडाऊनमुळे मधमाशांच्या वसाहतीमध्ये वाढ

ठळक मुद्देप्रजोत्पादनही चांगले ; उपनगरांमध्ये प्रमाण अधिक  

पुणे : लॉकडाऊनचा कालावधी निसर्गासाठी उपयुक्त ठरला असून, मधमाशी यांना देखील पोषकमय झाला आहे. या कालावधीत शहरात मधमाशांचे पोळ चांगल्या प्रकारे निर्माण झाले आणि त्यांना मानवी हस्तक्षेप किंवा प्रदूषणाचा त्रास झाला नाही. त्यामुळे एका कॉलनीत ८ ते ९ राणीमाशी तयार झाल्या. ज्या एरवी तीन ते चार होतात. तसेच मध देखील चांगला मिळाला अशी माहिती मधमाशीचे संवर्धन आणि अभ्यास करणारे अमित गोडसे यांनी दिली.  

लॉकडाऊनमध्ये शहरातील कोथरूड, वारजे, हडपसर, औंध, हिंजेवाडी या परिसरात पोळ अधिक प्रमाणात दिसून आले. या परिसरात फुले, फळे अधिक प्रमाणात फुलतात आणि शेतीचा भाग असल्याने मधमाशांना खाद्यही चांगले होते. मधमाशांना शंभर फुटांपेक्षा अधिक जागा पोळ तयार करायला लागते. ते या परिसरातील इमारतींवर करत असल्याचे दिसले. कारण इथे उंच उंच इमारती आहेत. गेली चार महिने मानवी हस्तक्षेप नसल्याने माशांना चांगला वावरता आले आणि एका ठिकाणी राहता आले. कारण त्यांचा त्रास नागरिकांना झाला नाही. कोरोनाची भीती मनात होती. म्हणून मधमाशांना हलविण्यासाठीही आम्हाला काँल्स आले नाहीत. अन्यथा एरव्ही खूप काँल्स येतात.कीटक किंवा इतर गोष्टींसाठी नागरिक औषध फवारणी किंवा पेस्ट कंट्रोलचा परिणाम मधमाशांवरही होत असतो. पण लाँकडाऊनमध्ये औषध फवारणी झाली नाही. ही गोष्ट मधमाशांसाठी पोषक ठरल्याचे गोडसे यांनी सांगितले.  

------------ 

लॉकडाऊनचा असाही परिणाम मधमाशापालन करणारे विजय महाजन म्हणाले, लाँकडाऊनचा मधमाशांवर चांगला परिणाम झाला. प्रदूषणरहित मध उपलब्ध झाला. पण दुसरा फटकाही बसला. कारण ग्रामीण भागात ४० पेट्या ठेवल्या होत्या. त्यांची देखरेख करण्यासाठी लाँकडाऊन असल्याने जाता आले नाही. त्यातील ३० पेट्या खराब झाल्या.''  

------------------------------ 

एसी च्या ठिकाणी धोका इमारतीमध्ये एसी लावला जातो. तेव्हा पाण्यासाठी पाइप भिंतीबाहेर काढतात. तेथील जागा व्यवस्थित बंद न केल्याने मधमाशा आता जाऊन पोळ करतात. पक्षी, कीटकांनाही ही जागा धोकादायक ठरते. म्हणून नागरिकांनी पाइप बाहेर काढल्यावर तेथील जागा पूर्ण बंद करायला हवी, अशी अपेक्षा अमित गोडसे यांनी व्यक्त केली. 

 ------------------------------------ 

कुंडीत फुलं, फळ जोपासावीत नागरिकांनी कुंडीत फुलं, फळं लावावीत. जेणेकरून मधमाशांसाठी खाद्य उपलब्ध होईल. तसेच जागा असेल तिथे तुळशी, नारळ, आंबा, जांभुळ, तूती, तामण अशी झाडं लावली पाहिजेत. त्यामुळे मधमाशांचा वावर वाढेल, असे गोडसे म्हणाले.

  --------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण