शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

भीमाशंकर मंदिराचा ताबा पुन्हा आदिवासी समाजाला मिळावा, विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:46 IST

आदिवासी समाजाने भीमाशंकर येथे घडलेल्या या घटनेचा निषेध करत पुन्हा भीमाशंकरवर आमचा हक्क मिळावा यासाठी मोर्चा काढला....

भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरावर खरा अधिकार हा आदिवासी समाजाचा आहे; परंतु हा समाज अत्यंत गरीब व मागास असल्यामुळे याचा गैर फायदा घेऊन पुजाऱ्यांनी ह्याचा कब्जा मिळवला आता हे आता पैशावरून एकमेकांशी भांडू लागले आहेत. आदिवासी समाजाने भीमाशंकर येथे घडलेल्या या घटनेचा निषेध करत पुन्हा भीमाशंकरवर आमचा हक्क मिळावा यासाठी मोर्चा काढला.

सोमवार दि.१६ रोजी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर गाभाऱ्यामध्ये गुरव समाजाच्या दोन गटात हाणामाऱ्या झाल्या याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या घटनेमुळे भीमाशंकर व ह्या आदिवासी भागाची बदनामी झाली ह्या घटनेच्या निषेधार्थ तसेच भीमाशंकर मंदिराचा ताबा पुन्हा आदिवासी समाजाला मिळावा व इतर मागण्यांसाठी सर्व आदिवासी संघटना व तमाम आदिवासी समाजाच्या वतीने म्हातारबाचीवाडी ते भीमाशंकर असा पायी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

सकाळी १० वाजता म्हातारबाचीवाडी येथे मोर्चाला सुरुवात झाली. भीमाशंकर येथे पोहोचल्यानंतर काही प्रमुख कार्यकर्ते व महिलांनी शंकराच्या पिंडीवर जलअभिषेक केला या नंतर बैठकीस सुरुवात झाली, शंकर मोहंडुळे, निवृत्ती गवारी संजय केंगले, प्रवीण पारधी विठ्ठल वनघरे अशोक पेकारी एकनाथ तळपे विजय आढारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या वेळी आदिवासी जनतेचे नेते सुभाषराव मोरमारे, प्रवीण पारधी, शंकर मोहंडुळे, दत्तात्रय हिले, भीमाशंकर संघर्ष समितीचे अध्यक्ष विठ्ठल वनघरे, नामदेव कोळप, शांताराम लोहकरे, सखाराम गभाले, एकनाथ तळपे, संतोष सुपे, निवृत्ती गवारी, संजय केंगले, विजय आढारी, अशोक पेकारी, मारुती लोहकरे, संजय गवारी, व परिसराती आदिवासी बांधव उपस्थित होते.

यावेळी जय बिरसा जय राघोजी भीमाशंकरांच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आदिवासी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा फौज फाटा लावण्यात आला होता. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर व २०० पोलिस उपस्थित होते.

भीमाशंकर मंदिराच्या पहिल्या पायरीवर सभा झाली यावेळी मान्यवरांनी घडलेल्या घटनेचा निषेध केला व भीमाशंकरवर पुन्हा आदिवासी समाजाचा हक्क प्रस्थापित व्हावा, मंदिरामध्ये हाणामारी केलेल्या ३६ जणांवर गुन्हा दाखल आहे. यांना जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत मंदिरातून बाहेर ठेवण्यात यावे अशा आशयाचे लेखी निवेदन खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील व आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांना दिले.

भीमाशंकर हे आदिवासी समाजाचं दैवत असून त्याची पूजा अर्चा करण्याचा मान हा आदिवासींचा पूर्वांपार होता. असे असताना बलुत्यावर आलेल्या व्यक्तींनी आमच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन कपट नीतीने फसवेगिरी करून आदिवासींचे मंदिर ताब्यात घेत महादेवाच्या श्रद्धेला, प्रतिष्ठेला काळिमा फासला आहे. या फसवेगिरीतून मंदिर मुक्त करण्यासाठी आता आम्ही आमचे अधिकार मागत आहोत. ते जर आम्हाला मागून मिळत नसतील तर आमच्या समाजाला बंडकरी जन्माला घालायचा इतिहास आहे. तोच इतिहास पुन्हा घडवणे आदिवासी समाजाला मुळीच अशक्य नाही.

- प्रवीण बुधाजी पारधी (अध्यक्ष, बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा)

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरPuneपुणे