शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजप व स्वाभिमानाचा दूरदूरचा संबंध नाही; आमदार रोहित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 11:28 IST

मंचर (पुणे) : जे विचारांना बांधील नाही, ज्यांनी चुका केल्या आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. स्वाभिमानी मराठी माणसे भाजप ...

मंचर (पुणे) : जे विचारांना बांधील नाही, ज्यांनी चुका केल्या आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. स्वाभिमानी मराठी माणसे भाजप सोडून इतर पक्षात आहेत. भाजप व स्वाभिमानाचा दूरदूरचा संबंध नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. बाळहिरडा प्रश्नावरून त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली.

रोहित पवार मंचर येथे आले असता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबाबत विचारले असता पवार म्हणाले, भाजपकडे सत्ता तसेच पैसा आहे. दबावामुळे काही नेते भाजपत गेले आहेत. पुढील काळात काही नेते तसेच आमदार भाजपत जातील, असे बोलले जाते. विचारांना जे बांधील नाही, ज्यांनी चुका केल्या आहेत ते भाजपत जात आहेत, असे सांगून पवार म्हणाले, अनेक लोकांशी संपर्क केला जाईल. मात्र, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जे बांधील आहेत ते आहे तिथेच राहतील. स्वाभिमानी मराठी माणसे भाजप सोडून इतर पक्षात आहेत.

भाजप व स्वाभिमानाचा दूरदूरचा संबंध नाही असे सांगून ते म्हणाले, आम्ही आमच्या पातळीवर लढत राहू. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर आज जे आहेत ते कुठेही जाणार नाहीत. खासदार अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाणार असल्याची चर्चा आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ही केवळ चर्चा असून लोकांमध्ये अशा चर्चा कोण घडवून आणतो ते आपल्याला माहिती आहे. भाजपच राजकीय पुड्या सोडत असते. अमोल कोल्हे यांच्याबाबत या हवेतील गप्पा सुरू आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल अशीसुद्धा चर्चा सुरू आहे, असे रोहित पवार म्हणाले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारBJPभाजपाcongressकाँग्रेस