शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

बीजेपीला वाटतेय राहुल गांधींची भीती

By admin | Published: September 27, 2015 12:42 AM

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला राहूल गांधी यांची भीती वाटते आहे, त्यामुळे राहूल काही बोलले तर लगेच अनेक केंद्रीय मंत्री त्यांचा प्रतिवाद करायला धावतात

पुणे : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला राहूल गांधी यांची भीती वाटते आहे, त्यामुळे राहूल काही बोलले तर लगेच अनेक केंद्रीय मंत्री त्यांचा प्रतिवाद करायला धावतात. १६ महिने झाले, केंद्र सरकारने दाखवलेल्या सर्व स्वप्नांचा फुगा आता फुटला आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी सतत देशाबाहेर राहतात अशी टीका माजी केंद्रीय व्यापार मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी शनिवारी पुण्यात केली.एका कार्यक्रमानंतर शर्मा यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर हल्ला चढवताना ते म्हणाले, ‘‘ जनतेला स्वप्नांचे गाजर दाखवत त्या लाटेवर निवडून आलेल्या मोदी सरकारला गेल्या १६ महिन्यात काहीही करून दाखवता आले नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल यांच्यावर ते सतत टिका करतात, याचे कारण त्यांना त्यांची भिती वाटते हेच आहे. राहूल चांगले काम करीत असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच भूसंपादन कायद्याच्या प्रश्नावर भाजप सरकारला गुडघे टेकणे भाग पडले.’’पेट्रोलचा आंतरराष्ट्रीय व्यापार कोसळत आहे, त्याचा मोठा फायदा भारताला होत आहे, मात्र हा फायदा जनतेपर्यंत पोहचत नाही. त्याचे काय होते याची चौकशी झाली पाहिजे. पंतप्रधान संसदेत अधिवेशनाला उपस्थित रहात नाहीत, माध्यमांबरोबर बोलत नाहीत, सतत परदेशात असतात. तिथे त्यांच्या मोठमोठ्या सभा होतात. या सभेचे खर्च कोण करीत आहे असा सवाल शर्मा यांनी उपस्थित केला. १६ महिन्यात त्यांचे २९ परदेश दौरे झाले, आताही ते अमेरिकेत आहेत, आणखी काही दिवसांनी ते फ्रान्सला चालले आहेत. परदेश दौऱ्यांचा त्यांना विक्रम करायचा असावा अशी टिका शर्मा यांनी केली.राहूल गांधी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर निवडून आले आहेत, त्यांची निवड झालेली नाही. योग्य वेळ येताच ते अध्यक्षपदही स्विकारतील. सध्या काँग्रेसजवळ सोनिया गांधींसारख्या आदर्श अध्यक्ष आहेत. तरीही माध्यमांकडून राहूल गांधी यांच्याबाबत प्रश्न केले जातात. मात्र बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह त्या पदापर्यंत कसे पोहचले? त्यांच्या भूतकाळाविषयी सर्व माहिती असूनही त्याबद्धल मात्र काहीही विचारले जात नाही, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीचे सदस्य गोपाळ तिवारी, कॉँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अभय छाजेड, पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर उपस्थित होते. (प्रतिनिधी)