शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

भाजपा धरणावर; शिवसेना रस्त्यावर

By admin | Published: November 23, 2015 12:53 AM

भामा-आसखेड व चासकमान धरणाचे पाणी उजनीला सोडू नये, म्हणून भाजपा धरणावर तर शिवसेना रस्त्यावर उतरली.

चाकण : भामा-आसखेड व चासकमान धरणाचे पाणी उजनीला सोडू नये, म्हणून भाजपा धरणावर तर शिवसेना रस्त्यावर उतरली. कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही, असा निश्चय दोन्ही पक्षांनी केला आहे. त्यामुळे पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयाला घरचा आहेर मिळाला आहे.भामा-आसखेड व चासकमान धरणातील पाण्यावर प्रथम लाभक्षेत्रातील शेतकरी व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यासाठी आम्ही सत्तेत असलो तरी प्रथम शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. एकदा पाणी सोडले की दुष्काळावर मात करता येणार नाही व पाणी परत मागे फिरविता येणार नाही. शासनाने कलम २३ नुसार हस्तक्षेप करून पाणी थांबवावे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.पुणे-नाशिक महामार्ग अडविलाचाकण : खेड तालुक्यातील शेती, जनावरे, पिण्याच्या पाण्यासाठी अडचण ठरणाऱ्या भामा-आसखेड तसेच चासकमान धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या निर्णयाविरोधात आमदार सुरेश गारे यांच्या नेतृत्वाखाली आंबेठाण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल अर्धा तास पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरण्यात आला. या वेळी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूककोंडी झाली होती. ‘पाणी आमच्या हक्काचं! नाही कुणाच्या बापाचं!’ अशा घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग अडविला. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. या वेळी तहसीलदार प्रशांत आवटे, मंडलाधिकारी राजाराम मोराळे व तलाठी अशोक सुतार यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.गोरे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, जिल्हा संघटक श्रद्धा कदम, जिल्हा उपप्रमुख नंदाताई कड, युवा सेनेचे गणेश कवडे, पं. स. सदस्य अमृता गुरव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खेड तालुका व तमाम शेतकरी बांधव उपस्थित होते.उजनीला पाणी सोडल्यास धरणात जलसमाधी घेऊ, जेल भरो आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे यांनी दिला. जिल्हाप्रमुख राम गावडे म्हणाले, उजनी धरणात ७२ टीएमसी पाणी असून, सोलापूरला केवळ दीड टीएमसी पाण्याची गरज असताना पाणी सोडण्याची गरज नाही. यामुळे भविष्यात तालुक्यात गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत.जिल्हा संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे आम्ही शासनात असलो तरी सर्वसामान्यांची गरज ओळखून रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही असे सांगितले. तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनीही धरणात जलसमाधी घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाघ, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जाधव, राजगुरुनगरच्या उपनगराध्यक्ष सारिका घुमटकर, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष शिळावणे, पांडुरंग गोरे, डॉ. किशोर घुमटकर, अ‍ॅड. प्रीतम शिंदे, स्वप्नील बिरदवडे, किरण गवारी, सुभाष मांडेकर, मंगल कड, महादेव लिंभोरे, दत्ता कंद, गोरक्षनाथ गवारे, महेंद्र घोलप, एल. बी. तनपुरे, रूपाली परदेशी, शेखर पिंगळे, स्वप्नील बिरदवडे, स्वामी कानपिळे, दीपाली भोई, माउली कड, धीरज केळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.खेड ते उजनी हे २३८ किलोमीटरचे अंतर असून, भामा-आसखेड व चासकमान धरणातील पाणी उजनीला सोडले तर ४० टक्के पाणीसुद्धा पोहोचत नाही. जलसंपत्ती प्राधिकरणाने आमची बाजू ऐकून घ्यावी, आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही येथील शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहोत.- सुरेश गोरे, आमदार शिवसेना