शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काळविटांच्या जिवाला अपघाताचा धोका , वाढत्या नागरीकरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 18:59 IST

पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३०० च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे.

ठळक मुद्देमागील चार  वर्षात २७ काळवीट मृत्युमुखी वाहनचालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावी

पुणे : भरधाव जाणारी वाहने, बेदरकार वाहनचालक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन...एकूणच कायदा-सुव्यवस्थेविषयीचा बेजबाबदारपणा काळविटांच्या जिवाशी खेळत आहे. वन्यजीव विभाग पुणेच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील ४ वर्षांत २७ काळविटे वाहन अपघातात मृत्यमुखी पडली आहेत. पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या  नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३००च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे. या दोघांनाही गवताळ प्रदेश आवश्यक आहे. कमी पाण्याची आवश्यकता असल्याने ते सहजासहजी दिसतात. रानटी कुत्री, कोल्हे, लांडगे हे काळविटाचे नैसर्गिक शत्रू. पूर्वी जमिनीची सलगता असल्याने काळविटांचा वावर मोठ्या प्रमाणावर होता. आता तुकड्या-तुकड्यांत जमिनी शेतीसाठी उपयोगात आणल्यानंतर प्राण्यांचा वावर कमी झाला. जिथे माळढोक पक्षी, तिथे काळवीट आढळ्त असल्याची माहिती वनसंरक्षक वानखेडे यांनी दिली. दोघांनाही झुडपे, जंगल, पाणवठ्याची जागा आवडतात. काळविटाला ओरडता येत नसल्याने तो बºयाचदा आपल्यावरील संकटाची सूचना उंच उड्या मारून देतो. यामुळे इतर पक्षी व प्राणी सतर्क होतात. काळविटाला लांबचे दिसत असल्याने तो पळून जाऊन आपले संरक्षण करू शकतो. वाढते नागरीकरण, वाहनांची संख्या, बेजबाबदार वाहनचालक, भरधाव वाहने यामुळे काळविटे अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहिल्यास त्यात २०१३-१४ या काळात २, २०१४-१५ मध्ये ६, २०१५-१६मध्ये १५, २०१६-१७ मध्ये ४ काळविटे वाहन अपघातात मृत्युमुखी पडली. राज्यात नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील रेहकुरी, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि नान्नज येथे काळविटे मोठ्या प्रमाणावर आढळतात. ही तिन्ही अभयारण्ये पुणे वन्यजीव विभागांतर्गत येतात. 

................

* वाहनचालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवावीउगीचच वेगाने वाहन चालविण्यापेक्षा संतुलित वेगाने वाहन चालविणे गरजेचे आहे. आपल्या चुकीमुळे निष्पाप वन्यप्राणी मरत असतील, तर दोष कुणाचा? प्राण्यांवर विसंबून राहण्यापेक्षा वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवावे. बºयाच अपघातांचे कारण पाहिल्यास ते वाहनांचा वाढता वेग असल्याचे दिसून येईल. - रवींद्र वानखेडे (वनसंरक्षक वन्यजीव विभाग, पुणे) 

* कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. नागरिक, वाहनचालक यांनी वन्यजीवांविषयीच्या कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. वन्यजीव  कायद्यातील तरतुदी कठोर असून नागरिकांनी होणाºया शिक्षेचा विचार करावा. नियमांचा आदर राखल्यास निसर्ग, प्राणी आणि आपण यांच्यात संवाद राखण्यास मदत होईल. - रंगनाथ नाईकडे (वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, पुणे)  

टॅग्स :PuneपुणेforestजंगलAccidentअपघात