शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर अग्निप्रदीपन

By admin | Published: October 12, 2016 2:29 AM

आपल्या कारखान्याकडे उपपदार्थनिर्मिती प्रकल्प नसल्याने शेजारील कारखान्यांच्या ऊसदराची तुलना करता येणार नाही. मात्र,

भवानीनगर : आपल्या कारखान्याकडे उपपदार्थनिर्मिती प्रकल्प नसल्याने शेजारील कारखान्यांच्या ऊसदराची तुलना करता येणार नाही. मात्र, काही वर्षांपूर्वी आपणही या कारखान्यांपेक्षा अधिक भाव देत होतो, हे लक्षात घ्यावे. सध्याची परिस्थिती अडचणीची आहे. उगीचच ओढून ताणून भाव देऊ नये, ही काही सभासदांनी मांडलेली भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण, मागील काही वर्षांत असा ओढूनताणून दर दिल्यामुळे कारखान्याला ५० कोटींपर्यंतचा तोटा झाला, ही वस्तुस्थिती सभासदांनी समजून घ्यावी’’ , अशी महिती छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी दिली.कारखान्याच्या ६१व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे तज्ज्ञ संचालक अभिजित रणवरे, त्यांच्या पत्नी मोनिका रणवरे यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्र मात घोलप बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कारखान्याकडे यंदा सभासदांच्या मालकीचा साडेतीन ते चार लाख टन ऊस उपलब्ध आहे. अतिरिक्त ऊस मिळविण्याचा प्रयत्न आहे. राज्यात चांगला कारखाना म्हणून कारखान्याचा नालौकिक आहे. शेतकऱ्यांच्या मालकीची ही संस्था चांगल्या पद्धतीने चालविली. यदां सर्वच धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील गळितासाठी चांगला ऊस उपलब्ध होण्याची आशा आहे. सभासदांचे विश्वस्त म्हणून संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यामुळे वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. १५० कोटींचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचे मोठे आव्हान होते. साखरधंदा अडचणीतून जात असताना सभासदांच्या सहकार्याची गरज आहे. सभासदांनी बाहेर ऊस घालू नये. मागील काळात अतिरिक्त ऊस असताना कारखान्याने तोटा सहन करून बाहेरील कारखान्याना ऊस पुरविला. तो पुरवला नसता तर ऊस शिल्लक राहिला असता. हीच स्थिती पुढील हंगामात आहे. कार्यकारी संचालक गोविंद अनारसे म्हणाले, ‘‘१९०० रुपये प्रक्विंटल असणारे साखरेचे दर ३४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले; परंतु केंद्राने दर नियंत्रित्र ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. त्यातून पुन्हा कारखानदारी अडचणीत येण्याची भीती आहे. संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष तानाजीराव थोरात म्हणाले, ‘‘संचालक मंडळाकडून यंदा गोड अपेक्षा आहेत. शुभेच्छा म्हणून काहीतरी सांगाल, ही आशा आहे. सभासद, कामगारांच्या कष्टांचे चीज करा.’’ अशोक काळे यांनी, ‘यंदा हुमणीच्या प्रादुर्भावामुळे गाळपासाठी किती ऊस उपलब्ध होईल?’ असा सवाल केला. तसेच, प्रत्येक संचालकाने प्रत्येकी १ कोटी ठेव गोळा करून, सभासदांकडून एकूण २४ कोटींच्या ठेवी गोळा कराव्यात. त्यातून भांडवल उपलब्ध होईल, अशी सूचना मांडली. तर, अ‍ॅड. संभाजीराव काटे यांनी ओढूनताणून भाव नको. सुवर्णमध्य साधा, असे मत व्यक्त केले.या वेळी छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे आदी संचालक, पदाधिकारी उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले. कामगारनेते युवराज रणवरे यांनी सूत्रंसचालन केले.