शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

बॉलिवूडमुळे झाकोळली मराठी कलाकारांची प्रतिभा! ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:23 IST

भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून खंत वाटते

पुणे : देशामध्ये १९५४ ते २०२४ पर्यंत ५० जणांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले. यात चित्रपट आणि संगीत क्षेत्रांतील ७ जणांचा गौरव झाला. मराठी असलेल्या लता मंगेशकर यांचा त्यात समावेश आहे; पण भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळके यांना मात्र अद्याप ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात आलेले नाही. तसेच महाराष्ट्रात बॉलिवूड कलाकारांना अधिक पद्म पुरस्कार मिळाले, त्यांच्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांकडे दुर्लक्ष होत आहे.

देशात महाराष्ट्रातील २६९ पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यापैकी मराठी व्यक्ती केवळ ५२ आहेत. ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मभूषण तर पं. भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. हे अपवाद सोडता महाराष्ट्रात राहणाऱ्या परंतु मराठी नसलेल्या २१६ जणांना पद्म पुरस्कार दिले आहेत. ज्या मराठीत्तर व्यक्तींना पुरस्कार दिले गेले, त्यांच्या गुणवत्तेबाबत शंका नाही. या व्यक्ती सर्वस्वी पुरस्काराला पात्र आहेतच; परंतु महाराष्ट्राच्या नावावर २६९ संख्या दिसत असताना त्यात मराठी व्यक्ती केवळ ५२ आहेत, अशी खंत राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. हेच तामिळनाडूत तब्बल १४७ पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. त्यात अन्य भाषक कोणीही नाही. कर्नाटकातील ४३ जणांना, आंध्र व तेलंगणाच्या ५९ जणांना, केरळच्या ५१ जणांना पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. या राज्यांचा आकार पाहता त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या अधिक दिसते. पश्चिम बंगाल व केरळमधील अनुक्रमे ७०, ५१ पद्म पुरस्कारार्थी आहेत. या राज्यातील कलाकारांची सांस्कृतिक जगतावर असलेल्या वर्चस्वाची साक्ष पटते.

महाराष्ट्रासाठी पद्म पुरस्कारांचा विचार करताना बॉलिवूड, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यक्ती व मराठी माणसांचा स्वतंत्रपणे विचार केला जावा, अशी मागणी आम्ही केली आहे. पद्म पुरस्कार येत्या काही दिवसांत जाहीर होतील, यावेळी खालील वास्तवाचा जरूर विचार करावा, अशी मागणी बाबासाहेब पाटील यांनी केली.

गेल्या ७५ वर्षांत कलाक्षेत्रातील २६९ पद्म पुरस्कारार्थी महाराष्ट्रातील असल्याचा आनंद आहे; पण यात केवळ ५२ मराठी कलाकारांचा समावेश आहे. सर्वोच्च भारतीय सन्मान असणाऱ्या ५० भारतीयांनंतरही फक्त एक मराठी कलाकार अर्थात गानसम्राज्ञी लतादीदींचे नाव आहे. आणि भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून खंत वाटते. बॉलिवूडमधील कलाकारांचा आदर असला तरी केवळ महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या अमराठी कलाकारांना पुरस्कारांत झुकते माप दिले जाते, हा मराठी कलाकारांच्या प्रतिभेचा अनादर आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल. -बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

टॅग्स :PuneपुणेartकलाcinemaसिनेमाMarathi Actorमराठी अभिनेताcultureसांस्कृतिकSocialसामाजिक