शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाकरी फिरली अन् जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चुळबुळ वाढली; शरद पवार गटाकडे खेपा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 11:54 IST

जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४४ सदस्यापैंकी बहुतांश सदस्य अजित पवार गटात होते. मात्र, आता हेच सदस्य शरद पवार गटात येण्यासाठी चुळबुळ करू लागल्याचे दिसत आहे....

- दुर्गेश मोरे

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुरब्बी राजकारणी आणि भाकरी फिरवणारा नेता म्हणून ओळखले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही त्यांनी अशी काही भाकरी फिरवली की विरोधकांची दाणादाण झाली. विशेष म्हणजे पुणे जिल्हा कोणाचा, अशीही चर्चा सुरू होती. लोकसभेच्या निकालानंतर पुणे जिल्हा अजित पवार नव्हे तर शरद पवारांचाच असल्याचे सिद्ध झाले. या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची चलबिचल वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४४ सदस्यापैंकी बहुतांश सदस्य अजित पवार गटात होते. मात्र, आता हेच सदस्य शरद पवार गटात येण्यासाठी चुळबुळ करू लागल्याचे दिसत आहे.

पक्षात फूट, नवे चिन्ह, केवळ एकच आमदार साथीला अशा परिस्थितीतही राष्ट्रवादीपासून दुरावलेल्यांची पुन्हा नव्याने मोट बांधत काँग्रेससह घटकपक्षांच्या मतदीने शरद पवार यांनी महायुतीला नामोहरण केले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा एक लाख ५८ हजार मतांनी विजय झाला. गेल्या निवडणुकीतील मताधिक्यात यावेळी वाढ झाल्याचे दिसले. त्यामुळे पूर्वी बारामती अजित पवारांची पॉवर असल्याचे जे बोलले जात होते ते आता बंद झाले आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांवर झाला आहे. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ४४, काँग्रेस ७, शिवसेना १३ भाजप ७, अपक्ष १, रासप १, लो. क्रा.आ. १ असे ७५ सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनेक सदस्य शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात, तर राष्ट्रवादीतील अजित पवार गटात सहभागी झाले. काहींनी भाजपची कास धरली, तर भाजपमधील काहींनी शरद पवार गटाला साथ दिली.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील शरद पवार गट कमकुवत जाणवत होता. जिल्हा परिषदेचे सदस्य कधी शरद पवारांकडे तर कधी अजित पवारांकडे ये-जा करत होते. दरम्यान, अजित पवार यांनी सदस्यांना स्पष्ट भूमिका घ्यायला लावली. त्यामुळे बहुतांश सदस्य अजित पवार गटात राहिले. दुसरीकडे शरद पवारांनी आपली भाकरी फिरवण्यास सुरुवात केली. त्याचा परिपाक म्हणजे सुप्रिया सुळेंचा विजय. या विजयामुळे जनतेची सहानुभूती शरद पवार गटाला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याने अनेक जिल्हा परिषद सदस्य आता शरद पवार गटात जाण्यास चुळबुळ करू लागले आहेत.

दौंडच्या राणी शेळके सुळेंच्या भेटीला

यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके यांनी उपस्थिती लावली. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण लोकसभा निवडणुकीत राणी शेळके यांनी अजित पवार गटाचे काम केले होते. निकालानंतर थेट खा. सुळेंच्या भेटीला आल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राणी शेळके यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्या म्हणाल्या, मी पहिल्यापासून राष्ट्रवादीतच आहे. मात्र, आपण निवडणुकीत अजित पवार गटाचा प्रचार करत होता आणि आज इकडे, असा प्रश्न उपस्थित करताच शेळके थोड्या गडबडल्या. खा. सुळे यांचे अभिनंदन करण्यासाठी आले असल्याचे सांगत कार्यक्रमस्थळावरून शेळके यांनी काढता पाय घेतला.

जुन्यांचे पुनर्वसन की नव्यांना संधी

पक्षफुटीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. सुप्रिया सुळे यांनी आमदारकीपासून ते सोसाटीपर्यंत सर्व निवडणुका लढवणार असल्याचे सुतोवाच केले होते. आता तर जनतेचे वारे शरद पवारांच्या बाजूने आहे. हे स्पष्ट झाल्याने शरद पवार गटात इनकमिंगचे वेटिंग वाढू लागले आहे. आगामी काळातील राजकारणात तारले जावे यासाठी ही धडपड सुरू असली तरी ज्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून ते नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही शरद पवारांची साथ सोडली नाही, अशा जुन्यांचे येत्या काळात पुनर्वसन होणार की गटात येणाऱ्या नव्यांना संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शरद पवार यावर काय भूमिका घेतात, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :PuneपुणेZP Electionजिल्हा परिषदlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार