शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

घरे फोडा, पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच प्रमुख उद्योग; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

By राजू इनामदार | Published: May 31, 2024 8:29 PM

पुण्याची सध्या होणारी बदनामी सरकारच्या निष्क्रियतेमुळे होत असून त्यावर हे गंभीर नाही

पुणे: पोर्शे अपघात प्रकरणात सरकारच्या वेगवेगळ्या खात्याकडून दररोज वेगवेगळे खुलासे करण्यात येत आहेत. गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन गेले, त्यांनी कोणालाही सोडणार नाही असे सांगितले. मग आता त्यांनीच राज्याला व देशाला नक्की काय ते सांगावे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

अहिल्याबाई होळकर यांच्या सारसबाग येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सुळे शुक्रवारी दुपारी पुण्यात आल्या होत्या. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली. पुण्यात देशपरदेशातून मुले शिक्षणासाठी येतात. पण, इथे ड्रग्ज कल्चर सुरू झाले आहे. अपघात होत आहेत. ससूनमधून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. पुण्याची ही बदनामी सरकारच्या निष्क्रियतेमुळे होत आहे. हे सरकार गंभीर नाही. घरे फोडा व पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच त्याचा उद्योग आहे असे सुळे म्हणाल्या.

हिंजवडी येथून आयटी उद्योग बाहेर जात आहेत, याकडे सुळे यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, हेही सरकारचेच अपयश आहे. शरद पवार यांनी जाणीपूर्वक हा आयटी उद्योग पुण्यात आणला. त्याचे एक स्वतंत्र मॉडेल तयार केले. आता ते सगळेच उद्ध्वस्त होत आहे, याचे कारण सरकारच गंभीर नाही. कांद्याचा निर्यात कर थांबवला ही फसवी घोषणा होती. आता कर्नाटकने ते केले, तर महाराष्ट्रात का नाही हे राज्य सरकारलाच विचारायला हवे.

ससून ही संस्था राज्यातील नव्हे, तर देशातील उत्कृष्ट संस्था आहे. तिथे मागील काही महिन्यात जे काही प्रकार घडले त्यात संस्थेचा नाही, तर तिथे राजकीय हस्तक्षेप होतो आहे, याचा दोष आहे. ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तिथे सापडल्यानंतर आता पोर्शे अपघातासंदर्भातही तिथेच घोटाळे होत आहेत. याचे कारण राजकीय हस्तक्षेप हेच आहे, असा थेट आरोप सुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस ललित पाटील प्रकरणानंतरही पुण्यात आले होते व आता अपघातानंतरही आले. त्यांनीच कोणाला सोडणार नाही अशी घोषणा केली. मग आता राज्याला व देशाला या प्रकरणांमध्ये नक्की काय आहे ते सांगण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे असे सुळे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीGovernmentसरकार