शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

Chandni Chauk: ७० टनाचे रणगाडे जातील इतका मजबूत होता चांदणी चौकातील पूल

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: October 3, 2022 18:59 IST

आवश्यक तेवढेच स्टील वापरत बनवला होता चांदणी चाैकातील पूल

पुणे : चांदणी चौकातील पूल तयार करताना त्यावरून एनडीएचे ७० टनांचे रणगाडे जातील, इतका मजबूत करण्याचे आम्हाला सांगितले हाेते. त्यानुसार आम्ही तो पूल बनविला होता. त्यासाठी खूप स्टील वापरल्याचे बोलेले गेले; पण तसे काहीही केलेले नाही. पुलाला जेवढे स्टील आवश्यक असते, त्यानुसारच ते वापरले, असे स्पष्टीकरण चांदणी चौकातील पूल बांधणारे सिव्हिल इंजिनिअर व डिझायनर सतीश मराठे (वय-७६) यांनी सांगितले.

मोठा गाजावाजा होऊन चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला. या पार्श्वभूमीवर हा पूल बांधणारे सतीश मराठे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ज्यांना हा पूल पाडायचा होता, त्यांना ते नीट जमले नाही, त्यामुळेच ते खोटं बोलत आहेत, असेही मराठे म्हणाले.

पुलाचे काम आमच्याच मार्फत

मी आणि माझे भागीदार मित्र अनंत लिमये आम्ही दोघांनी बरली इंजिनिअर्स नावाची कंपनी होती. त्या पुलाचे डिझाइन मीच केले होते. केंद्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ते काम आमच्याच मार्फत केले होते. तेव्हा कुलकर्णी आणि देशपांडे नावाचे सरकारी इंजिनिअर होते. त्यांनीदेखील प्रामाणिकपणे काम केले. मी आणि अनंत लिमये दोघांनी १९८२ ते २००२ दरम्यान २५ पूल बांधले आहेत. त्यात पुणे विभागात अधिक आहेत. कोल्हापूर, सातारा, नाशिक, निफाड येथे पण बांधले आहेत. निफाड येथील शंभर मीटरचा पूल, तर शंभर दिवसांत बांधला.

सतीश मराठे म्हणाले...

- साधारण १९९२ साली आम्ही आळंदीचा पूल बांधला आहे. तेव्हा पुलावरून पाणी जाईल, हे आम्हाला सांगितले नव्हते; कारण तेव्हा पूररेषा खूप खाली होती. आता पुलावरून पाणी जातेय, तरी तो उभा आहे.

- मागे म्हात्रे पुलाजवळील रस्ता खचला होता; पण पूल पडला असे बोलले गेले. पूल आणि रस्ता यांच्यात जमीन-आस्मानचा फरक आहे.

आम्ही आमचा व्यवसाय बंद केला...

पीडब्लूडीकडील पैसे संपल्यानंतर त्यांनी पीपीपीअंतर्गत तुम्ही बांधा, पैसे खर्च करा आणि मग टोलद्वारे पैसे घ्या, अशी योजना जाहीर केली. तेव्हा एकदम ३०० ते ४०० कोटी रुपये जमा करणे शक्य नव्हते. मग आम्ही आमचा व्यवसाय २००२ पासून बंद केला.

आता पुलाचे आयुष्य निम्म्यावर !

मी १९७० मध्ये इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. तेव्हा आम्हाला एका पुलाचे आयुष्य १०० वर्षे असल्याचे सांगितले गेले. माझ्या मुलाने पदवी घेतली तेव्हा त्याला पुलाचे आयुष्य ५० वर्षांचे असते, असे सांगितले. कोणाला नफा किती जास्त हवा, त्यावर सर्व ठरतं. चांगलं काम करूनही नफा मिळतो. ज्यांना अधिक हवा असतो, ते मग चोरीचे काम करतात.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnda puneएनडीए पुणे