शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

शासनाला लोकांशी जोडणारा सेतू

By admin | Published: April 20, 2017 6:46 AM

व्यासंग, कामाची आवड, चांगला जनसंपर्क असणा-यांसाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तेरा वर्ष लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये काम केल्यानंतर

व्यासंग, कामाची आवड, चांगला जनसंपर्क असणा-यांसाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तेरा वर्ष लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये काम केल्यानंतर ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून या विभागात नियुक्त झाले. या विभागात काम करीत असताना आपली आवड व व्यासंग जोपासण्यास वाव आहे. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भरपूर वाव आहे. सर्वसामान्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व अधिकारी आणि मंत्र्यांशी संपर्क येत असल्याने अनुभवविश्व संपन्न आणि समृद्ध बनते. उत्तराखंडचा प्रलय कामाच्या निमित्ताने जवळून पाहता आला. मुख्यमंत्र्यांसोबत तीन दिवसांच्या दौ-यामध्ये पिडीतांना मदत करण्यात आली. माध्यमांना साभाळणे आणि लोकांना मदत करणे, अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागली. २०१३ मध्ये अमरावती येथे उपसंचालक व नागपूर येथील माहिती संचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार असताना विविध विषयांवर माहितीपट, जिगंल्स, चित्रफितीची निमिर्ती करण्याची संधीही मिळाली. शासनाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे लोकराज्य खपाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. मराठी बरोबरच इंग्रजी, उर्दू, गुजराती या भाषेतही हे मासिक प्रसिद्ध होते. एकेकाळी वृत्तपत्र व आकाशवाणी ही दोन माध्यमे होती. आज दूरदर्शन, विविध चॅनल्स, सोशल मिडिया, वेबमिडिया ही प्रभावी ठरत आहे. त्यानुसार माहिती व जनसंपर्क विभागाने त्यात्यावेळी बदल करुन नव्या तंत्रज्ञानातही आघाडी घेतली आहे. फेसबुक, ट्ट्विटर, युट्युब, ब्लॉग, इंस्ट्राग्राम, फ्लॉक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा विभाग मोठ्या खुबीने करीत आहे. महत्वाच्या व्यक्तीच्या दौ-यांच्या कार्यक्रमाचे नियोजन अचूकपणे प्रसिद्ध करण्यासाठी २४ बाय ७ या सुत्रानूसार नेहमी तत्पर असते. या विभागाने अपलोड केलेले माहितीपट, शार्ट फिल्म, जिंगल्स युट्युबवर पाहायला मिळतात. माहिती तात्काळ मिळावी ाासाठी विविध प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप केले आहेत.अत्याधुनिक पद्धतीचे डिजिटल कॅमेरे या विभागाकडे आहे. काही ठिकाणी स्टुडिओ देखील आहे. मी मुख्ममंत्री बोलतोय यासारखे कार्यक्रम कमालीचे लोकप्रिय ठरत आहे. विभागाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह हे टेक्नोसेव्ही असल्याने त्यांनी या विभागाला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात एका उंचीवर आणून ठेवले आहे. आॅगस्ट २०१६ मधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यप्रदेशात दौऱ्याच्या वेळी अचानक जाऊन वृत्तांकन करण्याचा संदेश येताच चमूने रात्री त्याठिकाणी पोहचून वृत्तांकन करुन दौरा यशस्वी केला. माहिती व जनसंपर्क विभागात काम करणाऱ्या लोकांमध्ये खूप क्षमता आहे. माळीण गावावर माहितीपट निर्मितीचे काम सुरू आहे. थोड्याच दिवसात ते पूर्णही होईल.माहिती व जनसंपर्क विभागाला भविष्य उज्जवल आहे. येथील पत्रकार, प्रशासनातील अधिकारी यांचा समन्वयातून लोकांच्या स्मरणात राहील, असे काम करता येणार आहे. कारण शासन आणि जनतेला जोडणारा सेतू म्हणून या विभागाचे स्वत:चे वेगळे महत्त्व आहे.