शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

वीस एकर ऊस जळाला

By admin | Published: November 26, 2014 11:37 PM

मरकळ (ता.खेड) येथे विद्युत जानित्रतील बिघाड व तारांच्या घर्षणामुळे सुमारे 2क् एकर ऊस जळून खाक झाला.

शेलपिंपळगाव :  मरकळ (ता.खेड) येथे विद्युत जानित्रतील बिघाड व  तारांच्या घर्षणामुळे सुमारे 2क् एकर ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थांच्या व तरुण कार्यकत्र्यांच्या सतर्कतेमुळे पुढील शेकडो एकर ऊस आगीपासून वाचविण्यात नागरिकांना यश मिळाले. जळीत पिकाची साखर कारखान्यांनी लवकरात - लवकर तोडणी करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांकडून केली जात आहे.
मरकळ गावच्या पश्चिमेकडील बाजूस आळंदी रस्त्याच्या लगत शेकडो एकर क्षेत्र उस पिकाखाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या उसाच्या क्षेत्रत विद्युत तारांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून, तारा हाताच्या अंतरावर पोहचल्या आहेत. याबाबत सबंधित ऊस उत्पादक शेतक:यांनी अनेकदा विद्युत महामंडळ वितरण कंपनीकडे तक्रार केली होती. परंतु विद्युत महामंडळ कंपनीने कायमच शेतक:यांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. आज दुपारी दोनच्या सुमारास याठिकाणी असलेल्या विद्युत जनित्र पासून काही तरी बिघाड घडून आल्याने व लोंमकळत्या तारा एकमेकांना लागल्याने आगीच्या ज्वाळा तयार होऊन त्या जमिनीवर पडल्या. तारांच्या खाली उस पिक असल्याने अगदी कमी वेळात पिकाने पेट घेतला. आग मोठी असल्याने फार कमी वेळात जास्त उसाचे क्षेत्र पेटत गेले.
आगीमध्ये सुभाष लोखंडे, सावकार लोखंडे, बाबासाहेब थोरात, साळूबाई खांदवे, भुजबळ, शिवाजी गोडसे, मारुती घेनंद आदी उस उत्पादक शेतक:यांचा उस जाळून भस्मसात झाला आहे. दरम्यान गावातील ग्रामस्थ व तरुण कार्यकत्र्यांनी जमा होऊन हि आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली गेली. दरम्यान या पेटलेल्या उस पिकाची तलाठी भाऊसाहेब पाटील व अधिका:यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. ऊस पिकाची ज्या कारखान्याकडे नोंद केलेली आहे, तो कारखाना हा पेटलेल्या उसाची तोडणी करणार असल्याचे अधिका:यांकडून समजते. विद्युत महामंडळ कंपनीचा कामगार गावात कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
 
4मरकळ (ता.खेड) परिसरात पाण्याची हमी असल्याने हजारो हेक्टर क्षेत्र उस पिकाच्या लागवडीखाली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील विद्युत यंत्रणा धोकादायक अवस्थेत आहे. विद्युत  तारा हाताच्या अंतरावर येऊन पोहचल्या आहेत. तर काही ठिकाणी नागरी वस्तीत घरांवर या  तारा येऊन पोहचल्या आहेत. याबाबत  विद्युत महामंडळ कंपनीकडे शेतक:यांनी वारंवार तक्रार करूनही सबंधित कंपनी शेतक:यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
 
4विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे उस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान घडून आले आहे. लोकवस्तीत काही  ठिकाणी तारा हाताच्या अंतरावर आलेल्या आहेत. आज उस या तारांना बळी पडला त्यामुळे विद्यत महामंडळ कंपनीने तात्काळ शेतक:यांच्या अडचणी लक्षात घेऊन झालेल्या तारांची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी माजी सरपंच अनिल लोखंडे, कैलास लोखंडे, रमेश गोडसे, सुभाष लोखंडे, सावकार लोखंडे, बाबासाहेब थोरात, साळूबाई खांदवे, शिवाजी गोडसे, मारुती घेनंद आदींसह नागरिक करत आहेत.
 
आगीला बळी पडलेल्या उसाची उद्यापासून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून तोडणी सुरु केली जाईल. ज्या शेतक:यांनी आपला उस इतर कारखान्यांना नोंदविला आहे, त्यांनी त्या कारखान्यांना संपर्क साधून ऊस तोडून घ्यावा. शेतक:यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जाईल
- अनिल लोखंडे ,
 मा. उपाध्यक्ष. संत. तुकाराम सहकारी साखर कारखाना