शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्याला केंद्रच जबाबदार; वेळप्रसंगी दिल्लीतील जंतरमंतरवरून पण जाब विचारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 6:14 PM

काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्य अध्यक्ष भानूदास माळी यांचा इशारा

ठळक मुद्देसरकारी नोकऱ्या शिल्लक नसून खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही यावरून राज्यातील ओबीसी समाज संतप्त आहे

पुणे: ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्याला राज्य सरकार नाही तर केंद्र सरकारच जबाबदार आहे. वेळप्रसंगी सगळे ओबीसी दिल्लीत जंतरमंतरवर जमून मोदी सरकारला याचा जाब विचारतील, असा इशारा काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्य अध्यक्ष भानूदास माळी यांंनी दिला.

काँग्रेस भवनमध्ये माळी यांनी शहरातील प्रमूख ओबीसी पदाधिकार्यांची बैठक घेतली. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चवधरी यावेळी ऊपस्थित होते.

माळी म्हणाले, केंद्र सरकारने ओबीसी संदर्भातील अहवालच एकाही राज्यांना दिलेला नाही. विधानसभेचे माजी अध्यक्ष यांनी विधानसभेत ठराव करून या अहवालाची मागणी केंद्र सरकारकडे केली. मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही. सरकारी नोकऱ्या शिल्लक नाहीत. व खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही. राज्यातील ओबीसी समाज यावरून संतप्त आहे.

त्यावरून काहीही होऊ शकते असा इशारा देऊन माळी म्हणाले, मराठा आरक्षणाशी याचा संबध नाही. शिवसेना राष्ट्रवादी यावर आक्रमक दिसत नाहीत, पण तो त्यांचा पक्षीय प्रश्न आहे, काँग्रेसने सुरूवातीपासून यावर आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. 

राजकीय आरक्षण मिळणारच आहे. पण तोपर्यंत राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना ओबीसी आरक्षण द्यावे 

राज्य सरकारला केंद्राने तो अहवाल त्वरीत ऊपलब्ध करून द्यावा. अन्यथा राज्यातील समस्त ओबीसी समाज दिल्लीत जाऊन मोदी सरकारला याबद्दल जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी संघटीत नाहीत म्हणून रोष दिसून येत नाही. पण एकत्र येतील तर कोणाला ऐकणार नाहीत. राजकीय आरक्षण मिळणारच आहे. पण त्याला वेळ लागेल. तोपर्यंत राजकीय पक्षांनी ऊमेदवारी देताना ओबीसी आरक्षण द्यावे. अशी मागणी काँग्रेस प्रदेश ओबीसी संघटना करत आहे. बैठकीतही त्यावरच चर्चा झाली असे माळी यांंनी सांगितले. प्रदेश सरचिटणीस सुनील पंडित तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी