शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चाकण परिसरात उदयाला येतोय बाल गुन्हेगारीचा चाकण पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:14 IST

चाकण : चाकण परिसरात अल्पवयीन मुले खून, हाणामाऱ्या, वादविवाद, चोऱ्या, दादागिरी आदी प्रकरणासह व्यसनांकडे वेगाने वळताना दिसून येत आहे. ...

चाकण : चाकण परिसरात अल्पवयीन मुले खून, हाणामाऱ्या, वादविवाद, चोऱ्या, दादागिरी आदी प्रकरणासह व्यसनांकडे वेगाने वळताना दिसून येत आहे. मागील पाच सहा वर्षात चाकणच्या भोईकोट किल्ल्यातील रस्त्यावर एका मुलाचा खून, त्यानंतर काळूस आणि मेदनकरवाडी येथेही खुनाच्या घटना आणि पुन्हा एकदा दोन दिवसांपूर्वी चाकण शहरात अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनांचा मागोवा घेतला तर अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत, हे यावरून स्पष्ट होते.

चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळे इझी मनीला महत्त्व वाढले आहे. यामुळे कंपन्यांमध्ये विविध कामांचे ठेके घेण्यासाठी गुन्हेगारी वाढली आहे.परिसरात अल्पवयीन मुलांच्या अनेक गॅंग आणि टोळ्या तयार झाल्या आहेत. भाऊ, भाई, दादा, भावा, महाराज आदी नावांनी ग्रुप, टोळ्या कार्यरत आहेत. वेगवेगळ्या ऍक्शनमधील फोटो फ्लेक्स, सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धमक्या देणे, जमिनीचे ताबे घेणे, कंपन्यांमध्ये ठेके घेणे, दहशत निर्माण करणे, खंडणी वसुली, हप्ता गोळा करणे आदी कामे अशा ग्रुपकडून केली जात आहेत. अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांना आणि ग्रुपला गॉड फादर असून, तेच यांना रसद पुरवून त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाई करून घेत आहेत.

चाकण पंचक्रोशीतील युवक व अल्पवयीन मुलांनी टोळ्या व ग्रुप करायचे व त्या माध्यामातून गुन्हेगारी करण्याचा नवा फंडा या परिसरात रुजू होत आहे. गुन्हेगारीकडे वळणारी पावले रोखण्याचे मोठे आव्हान पोलिस व समाजासमोर निर्माण झाले आहे. गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या बंद करावयाच्या असतील, तर या टोळ्यांमध्ये होणारी भरती थांबवावी लागेल. त्यासाठी त्यांतील प्रमुखांना कायद्याच्या कचाट्यात घ्यावे लागेल. नुसत्या दंडूकेशाहीने हा प्रश्न सुटणार नाही. बहुतेक मोठ्या कुख्यात गुन्हेगारांनी त्यांच्या गुन्हेगारीची सुरूवातच बालवयात केल्याची अनेक उदाहरणे आहेत.त्यामुळे मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये व समाजाला वेठीस धरणारा गुन्हेगार तयार होऊ नये. यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता या भागात निर्माण झाली आहे.

* चाकण परिसरातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये बाल गुन्हेगारांचा सहभागी दिसून येतो आहे.यातील मुलांच्या घराची परिस्थिती बेताची असल्याने आई वडील दोघेही कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि घरच्यांचा नसलेला धाक यामुळे अशी मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या माध्यमातून अशा मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी योग्य प्रयत्न केले जात आहेत. पालकानींही आपल्या पाल्यांकडे जागरूक राहून लक्ष देणे गरजेचे आहे. - अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे.

* बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनी संस्कारक्षम वयातच मुलांना चांगल्या वाईट गोष्टींचे परिणाम काय होतात याची माहिती देणे आवश्यक आहे. आपली मुले, दिवसभर कुठे फिरतात? कोणाबरोबर असतात? ते नियमित अभ्यास करतात का? याकडे लक्ष द्यायला हवे. - सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश अरगडे.

----------------------------