शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
3
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
4
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
5
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
6
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
7
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
8
अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम
9
Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!
10
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव
11
Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!
12
नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास
13
Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर
14
मिशन विधानसभा! सोलापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांकडून ६१ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं
15
"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
16
"मी तिला मारलं नसतं तर तिने मला..."; महालक्ष्मीचे ५० तुकडे करणाऱ्याच्या नोटमध्ये धक्कादायक दावा
17
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
18
'या' दिवशी गुंतवणूकीसाठी खुला होणार देशातील सर्वात मोठा IPO; प्राईस बँड किती? ग्रे मार्केट प्रीमिअम देतोय टेन्शन
19
खळबळजनक! IPS अधिकाऱ्याचं लोकेशन ट्रॅक करणाऱ्या ७ पोलिसांचं निलंबन, काय आहे प्रकार?
20
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."

कंत्राटी कामगारांचे कंपनी विरोधात चक्री उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:25 AM

कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे मत या कामगारांनी व्यक्त केले आहे.

कुरकुंभ - कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे मत या कामगारांनी व्यक्त केले आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये अ‍े -८८ मधील आॅनर ह्या कंपनीत ओम इंजिनिअरींग नावाने असणाºया कंत्राटात वरील उपोषणास बसलेले कामगार काम करीत होते. मात्र, काही कारणास्तव वरील कंत्राटदाराने आपले कंत्राट सोडून दिल्याने हे कामगार देखील कामावरून बाहेर झाले. मात्र, हे कामगार तालुक्यातील असल्याने त्यांनी आम्ही जवळपास चार वषार्पासून कामाला आहोत. त्यामुळे कंत्राटदार जरी गेला असला तरी आम्हाला कामावर घ्यावे अशी मागणी केली. मात्र, कंपनीने ती अमान्य केली आहे. परिणामी केलेल्या चार वर्षाच्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळावा यासाठी त्यांनी हे उपोषण सुरु केले आहे.दिवसेंदिवस कामगार कायद्यात झालेल्या बदलाने खाजगी कारखानदार कंत्राट पद्धतीचा वापर करीत आहेत. त्यामुळे कंत्राटाची मर्यादा संपली कि कामगार कामावरून बेदखल होत आहेत. सर्वच ठिकाणी असंघटीत कामगार संखेत वाढ होत असल्याने कामगारांच्या बºयाच मागण्या ह्या व्यवस्थापनाकडून ग्राह्य धरल्या जात नाहीत. परिणामी कामगार व कंपनी व्यवस्थापन हा वाद नेहमीच होताना दिसून येतो. दरम्यान कामगार हा नेहमीच कामाची जागा अगदी अल्पावधीत बदलत असल्याने त्यामुळेही बºयाचदा त्यांना कायमस्वरूपी होणे अवघड असते.वरील चक्री उपोषण करणाºया कामगारांनी कामगार न्यायालयात धाव घेवून त्यांच्यावर झालेल्या अन्याय विरोधात दाद मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ असल्याने याबाबत नक्की काय निकाल येणार हा अजून येणारा काळ सांगणार आहे. मात्र तो पर्यंत सुरु झालेल्या ह्या उपोषणाने कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्या मधील दुरावा आणखीनच वाढवला आहे यात शंका नाही मात्र या संघर्षात कामगार व व्यवस्थापन याचं नुकसान होणार हे निश्चित आहे.आम्ही गेल्या चार वर्षापासून या कंपनीत कामास आहोत. कंत्राटदार मार्फत कामास असलो तरी आम्ही स्थानिक आहोत. कंत्राट जरी संपले असले तरी आमच्या बाबतीत साकाराकात्मक विचार करणे गरजेचे आहे. चार वर्षातील पी एफ व अन्य झालेल्या नुकसानभरपाई देण्यात यावी.- हनुमंत निगडे, पिडीत कामगारकंपनीने पाहिले सहा महिने प्रायोगिक तत्वावर काम दिले होते व पुढील काळात सर्व शासकीय नियमानुसार वेतन व अन्य कामगार हिताचे नियम सुरु करून देणार होते मात्र कंपनीने चार वर्षापर्यंत काहीच दिले नाही परिणामी काम सोडण्यास भाग पडले.- रामराव गिरिमकर,कंत्राटदार ओम इंजीनिअरिंगकामगार हे कंपनीच्या मार्फत दिल्या गेलेल्या ओम इंजिनिअरिंग या कंत्राटदार कंपनी कडे होते. या कंत्राटदार कंपनीने स्वत:हून त्यांचे काम सोडून दिल्याने हे कामगार कामावरून बंद झाले आहेत. प्रत्यक्षरित्या त्यांचा व कंपनीचा काही एक सबंध नाही. त्याला स्वर्वस्वी कंत्राटदार जबाबदार असून सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यावरच याबाबत आणखी बोलणे उचीत राहील.- दस्तगीर मुजावर, व्यवस्थापन अधिकारी आॅनर.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या